सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सदस्य निवडीवेळी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एम आय एम या पक्षामध्ये कुरघोड्या झाल्या होत्या अनेकांना डावलल्याने नाराजीचा सूर होता मात्र काँग्रेस पक्षाकडून वरिष्ठांनी दिलेली नगरसेविका वैष्णवी करगुळे तसेच नगरसेविका परविन इनामदार या दोघांची नावे फायनल झाली त्यामुळे कॉंग्रेसच्या पक्षातील एकीची आणि निष्ठेच कौतुक झाले, त्यामुळे गटनेते चेतन नरोटे यांची छाती अभिमानाने फुगून गेली, वैष्णवी करगुळे या आमदार प्रणिती शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानल्या जातात त्यांचे पती अंबादास करगुळे यांच्या तर प्रत्येक भूमिकेला आमदार प्रणिती शिंदे यांचा पाठिंबा असतो एकीकडे आमदार प्रणिती शिंदे यांनी महापालिकेच्या सर्व घडामोडींमध्ये महाविकासआघाडी एकत्रित काम करेल अशी भूमिका काही कार्यक्रमांमध्ये मांडली होती गुरुवारी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना करगुळे आणि इनामदार या दोघीसाठी मनोज शेजवाल हे स्वतः वाट बघत बाहेर थांबले होते त्या दोघी आल्यानंतर त्यांना सन्मानाने त्यांनी आत घेऊन गेले मात्र जेव्हा शुक्रवारचा दिवस आला तेव्हा वैष्णवी करगुळे नॉट रिचेबल होत्या त्यांचे पती अंबादास करगुले व नगरसेविका वैष्णवी करगुळे या दोघांचेही फोन बंद होते नगरसेविका करगुळे भारतीय जनता पार्टीला मॅनेज झाल्याची चर्चा महापालिकेत ऐकण्यास मिळाली, गटनेते चेतन नरोटे यांचे ही तोंड पडले होते जेव्हा त्यांची प्रतिक्रिया घेतली तेव्हा हे चुकीचा आहे महाविकासआघाडी असताना त्यांनी फोन बंद ठेवणे योग्य नसून पक्षांच्या वरिष्ठांना हे सर्व सांगितले आहे त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल अशी माहिती दिली.
यापूर्वी काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सभागृहात स्वतंत्र आंदोलन केल्याने त्यांना पक्षाने नोटीस बजावली होती, दोन्ही बाजू ऐकून घेतल्या नव्हत्या, पक्षाच्या एककल्ली भूमिकेवर नाराज होऊन वैतागलेल्या श्रीदेवी फुलारे पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला, असे असतानाही महापौर व उपमहापौर निवडीत फुलारे यांनी काँग्रेस तर्फे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले होते आता तर काँग्रेसच्या करगुळे यांनी थेट महाविकास आघाडीच्या नेत्यांना तोंडघशी पाडले आहे, फोन स्विच ऑफ करणे या मागील अर्थ काय? आमदार प्रणिती शिंदे यांना न सांगता ही कृती आहे का? महापालिकेतील महेश कोठे यांच्या नेतृत्वाला शह देण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठांची ही खेळी तर नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून आता त्यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार अशी चर्चा रंगली आहे.


















