बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी दोन दिवस सूत्र हलवली. बऱ्याच राजकीय हालचाली केल्या पण अखेर मोहिते पाटील यांनी या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला चॅलेंज दिले आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात आता ही निवडणूक होत आहे.
दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहापैकी पाच जणांनी माघार घेतली. वसंतराव देशमुख शेवटपर्यंत अर्ज काढायला आलेच नाही त्यामुळे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना “काही नेत्यांच्या इगो मुळे ही निवडणूक लागल्याचे” सांगत या निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देणार असे आव्हान दिले.
आमदार कल्याणशेट्टी यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस पक्षाकडून सूचकाने हरकत घेतल्याने अर्ज बाद झालेले आदित्य फत्तेपुरकर यांनी कल्याण शेट्टी यांच्या प्रतिक्रियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘कूटनीती करून माझा अर्ज बाद केला आता भोगाकर्माची फळे’ असे कमेंट फत्तेपुरकर यांनी दिले असून त्याला लाईक मिळत असल्याचे दिसून येते.
















