‘पाणी आवर्तन’ वरून खासदार प्रणिती शिंदे अन् आमदार देवेंद्र कोठे यांच्यात शाब्दिक !
सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या सभेत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले.
उजनी धरणातून पाणी सोडणे, वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडणे अशी मागणी करत समांतर जलवाहिनीमुळे उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या चार पाण्याच्या आवर्तनात घट करून आता दोन आवर्तन करण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
यावर प्रशासनाकडून उत्तर अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले त्या बोलतात लगेच भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी समांतर जलवाहिनीवर बोलण्याचा प्रयत्न केला असता वरून प्रणिती शिंदे यांनी “थांबा पहिले उत्तर येऊ द्या” असे म्हणतात खालून कोठेही जोर जोरात आपला मुद्दा मांडू लागले, तेव्हा खासदार शिंदे यांनी त्यांना पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभागृहात थोडा गोंधळ उडाला. तरीही कुठे यांनी मला या विषयावर बोलायचं आहे म्हणून आपला विषय मांडलाच.
समांतर जलवाहिनी झाल्यामुळे शहराला पाण्याची अडचण जाणवली नाही. उजनी धरणातून दुबार किंवा तिबार पंपिंग सुद्धा झाली नाही असे सांगत उलट चार आवर्तन ऐवजी दोनच आवर्तन सोडल्याने पाण्याची बचत झाल्याचा मुद्दा मांडला.
जेव्हा प्रशासनाकडून उत्तर आले तेव्हा प्रणिती शिंदे यांचा विषय जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा होता. त्यांनी भीमा नदीत पाणी सोडण्याबाबत विषय उचलण्याचे दिसून आले. त्यांनी माझा विषय समजला नाही असा टोलाही वरून हाणला.

















