उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी देण्याचा आदेश 22 एप्रिल 2021 रोजी निघाला होता, या आदेशात उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयातून उचलून शेटफळगढे येथे नवनी मुठा उजवा कालव्यात 161 किलोमीटर येथे सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्याचा उल्लेख होता, त्या आदेशानंतर सोलापुरात सर्वस्तरातून संतापाचे वातावरण निर्माण झाले .
इंदापूरचे आमदार तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांनी सोलापूरचे नियोजित एक थेंबही पाणी इंदापूर ला नेणार नाही असे वारंवार माध्यमांसमोर सांगितले होते परंतु पालकमंत्र्यांच्या भूमिकेला सोलापुरात सर्वपक्षीय विरोध झाला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस भारतीय जनता पार्टी यांच्यासह शेतकरी संघटना यांनी विरोध केला होता, या प्रकरणात करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी पुढाकार घेतला जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते आमदार यांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली मात्र ही बैठक फेल गेली एकही आमदार या बैठकीला आला नाही, जे उपस्थित होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे ठरले.
त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सात आमदार एक खासदार यांची बैठक झाली त्यांनी शुक्रवार 21 मे रोजी पंढरपूर मधील नामदेव पायरी वर आंदोलन करण्याची भूमिका बोलून दाखवली मात्र करमाळा चे आमदार संजय मामा शिंदे यांनी या प्रकरणात पुढाकार घेतला त्यांनी या प्रकरणात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली .
त्यानंतर पुढे मंगळवारी आमदार यशवंत माने जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील माळशिरस ते नेते उत्तम जानकर, माजी आमदार दीपक साळुंखे पंढरपूरचे नेते कल्याणराव काळे वैराग चे नेते निरंजन भूमकर यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली यांना निवेदन दिले .
उजनी जलाशया मधून प्रस्तावित केलेल्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला प्रकल्पाच्या स्थिरीकरण योजनेला स्थगिती देण्याची मागणी केली ती मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी त्वरित मान्य केली, उजनी धरणातून इंदापूरच्या सिंचन योजनेसाठी देण्यात येणार्या पाण्याचा तो आदेश जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनी रद्द केल्याच पत्र आमदार संजय मामा आणि त्यांच्या शिष्टमंडळाला दिले. या प्रकरणात नारायण पाटील यांचा प्रयत्न फसला, भाजप आमदारांचे पंढरपुरातील आंदोलन आता होणार नसल्याचे दिसत आहे.



















