कोविड ही महामारी भारतात आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली, देश आहे तिथे थांबला, परप्रांतीय, अडकलेले कामगार, रस्त्यावर राहणारे भिक्षेकरी, वंचित, गरजू ,गरीब, अनाथ यासह ज्यांचे हातावर पोट आहे अशांची मोठी अडचण झाली, खायचे काय असा प्रश्न प्रत्येकाच्या समोर होता,
राजकीय पक्ष , संस्था, संघटना तसेच दानशूर व्यक्ती अशावेळी धावून आले प्रत्येकाने आपापल्या परीने धान्य देऊन मदत केली, काहींनी दिखावा करत प्रसिद्धीची स्टंटबाजी केली, परन्तु या लॉकडाऊनमध्ये सर्वात लक्षात राहिलेला ग्रुप म्हणजे केतन वोरा मित्र परिवार. या मित्र परिवारात कुशाल देढीया, धिरेन गडा, कल्पेश जव्हेरी, राजू वोरा, यांचा समावेश आहे, यांना उद्योगवर्धिनीच्या प्रमुख चंद्रिका चौहान यांची मोलाची साथ लाभली आहे, आणि त्यामध्ये स्वतः केतन वोरा यांचा सर्वत्र पुढाकार होता, हा परिवार प्रिसीजन उदयोग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो.
कोरोना लॉकडाऊनमध्ये सोलापूरात अडकलेले पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश तामिळनाडू या भागातील नागरिकांना परत आपल्या राज्यात जाण्यासाठी सरकारने रेल्वेची सुविधा उपलब्ध केली, प्रवास हा दोन दिवसांचा तसेच त्यापेक्षा कमी आणि जास्त वेळेचा असल्याने आणि रेल्वे कुठे ही थांबत नसल्याचा विचार करून केतन वोरा यांनी या प्रवाशांना पार्सल स्वरूपात जेवण पुरवले, प्रिसीजन उद्योग समूह, लक्ष्मी हायड्रोलिक्स, यासह क्रॉस इंटरनॅशनल यांनी जेवण पूरवले, ते जेवण बनवण्याचे काम उदयोगवर्धिनीच्या चंद्रिका चौहान यांच्या टीमने केले.
मध्यंतरी कोविडचा संसर्ग कमी झाला तेव्हा गरजूंना आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे व सुहास छंचुरे तसेच रॉबिनहुड आर्मीचे हिंदुराव गोरे यांच्या टीम मार्फत भोजन देण्याची सेवा अविरत चालू ठेवली , कोरोनाची दुसरी लाट आली, महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन झाले, पुन्हा रुग्ण वाढले त्यात विविध हॉस्पिटलमध्ये दाखल असलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईक असे दररोज 200 जणांना केतन वोरा मित्र परिवार भोजन पुरवत आहे,
जोपर्यंत लॉकडाऊन राहणार तोपर्यंत ही सेवा सुरूच राहील असे केतन वोरा यांनी सांगितले आहे. कोरोना या महामारीत प्रशासन असेल, उद्योजक असतील, संस्था असतील, संघटना असेल तसेच गरजू नागरिक असतील यांच्यातील केतन वोरा यांनी समन्वयकाचे काम केले आहे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मानाने वोरा यांना गौरविण्यात आले .लॉकडाऊन मधील लाखो वंचित, अनाथ,गरजूंचा ते ‘आधार’ बनले हे मात्र निश्चित.























