समाधान आवताडे यांच्या रूपात भारतीय जनता पार्टीचा पुन्हा एक आमदार जिल्ह्यामध्ये वाढला आहे, आता सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे दोन खासदार आणि आठ आमदार एवढे मोठे संख्याबळ झाले आहे त्यामुळे राष्ट्रवादी पेक्षा भाजपा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष गणला जातोय.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या समविचारी आघाडीची सत्ता आहे, जिल्हा परिषद अध्यक्ष जरी शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले असले तरी ते मोहिते-पाटील समर्थक आहेत दरम्यानच्या काळामध्ये जिल्हा परिषदेतील पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये समन्वय नसल्याने एकमेकांच्या फाईल आडवा आडवी झाली, विजयराज डोंगरे यांचा ओढा काहीसा आमदार संजयमामांकडे असल्याने याचा करमाळाकरांना याचा थोडा त्रास होतो त्यामुळे वाद वाढला शेवटी हा वाद सर्वश्रेष्ठीं समोर गेला त्यामुळे सर्व आमदारांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेचा हा वाद मिटवून मिटवण्याचे ठरवले, सोलापूर शहरातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या नंदादीप या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार प्रशांत परिचारक आमदार रंजीतसिंह मोहिते-पाटील आमदार समाधान आवताडे आमदार राजाभाऊ राऊत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी या सर्व नेत्यांची बैठक झाली
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे त्यांचे सहकारी मित्र अजित तळेकर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे, झेडपी पक्ष नेते अण्णाराव बाराचारे, सदस्या आनंद तानवडे, मदन दराडे, अरुण तोडकर यांची उपस्थिती होती. बैठकीत समन्वय राखून काम करण्याचा सूचना करण्यात आल्या सर्व विभागप्रमुखांना बोलावून ही निधी देण्याबाबत सूचना झाल्या त्यानंतर पत्रकारांशी बोलताना आता यापुढे जिल्हा परिषदेवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक सोमवारी एक आमदार मुख्यालयात येईल आणि आपल्या सदस्यांची कामे करून घेतील असे ठरले
याच दरम्यान राष्ट्रवादीच्या सदस्य रेखा राऊत आणि स्वाती कांबळे यांनी भाजपच्या आमदारांवर टीका करताना आमदारकि सोडून जिल्हा परिषद सदस्य व्हा अशी टर त्यानी उडवली. महिला सदस्यांनी केलेली टिंगल पाहून सोमवार 24 मे रोजी जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार फिरकला नाही, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा हा बार फुसका निघाला अशी चर्चा राष्ट्रवादीच्या सदस्यांमधून ऐकण्यास मिळाली. खरेतर ही बैठक डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांच्यासाठी महत्त्वाची होती, पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने यश मिळवल्याने प्रशांत परिचारक यांची ताकद वाढली आहे, त्यांनी आतापासूनच सर्वांना एकत्र करून पुन्हा मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढल्याने विधानपरिषदेचा आमदार पुन्हा भाजपचा होईल असा विश्वास सर्व खासदार आणि आमदारांना आहे. एकीकडे भाजप कडून पुन्हा प्रशांत परिचारक हे विधान परिषदेसाठी प्रयत्न करत असतानाच दुसरीकडे महाविकासआघाडी तून काही नेते विधान परिषदेची तयारी करतअसल्याचे चित्र आहे.


















