सोलापूर : ऑल इंडिया वीरशैव लिंगायत महासभेच्या वतीने युवक राष्ट्रीय उपाध्यक्ष सुदीप चाकोते यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या निवेदनातून नवी दिल्ली येथे होत असलेले नवीन संसद भवनाला अनुभव मंडप असे नामकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन दिल्यानंतर चाकोते म्हणाले, १२व्या शतकात महात्मा बसवेश्वर महाराजांनी देखील सामाजिक अडचणीवर मात करण्यासाठी समाजातील सर्व जाती-धर्म-पंत यांच्यातील वाईट चालीरीती यांना विरोध करून समाजात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने एक यंत्रणा तयार केली. त्यालाच अनुभव मंडप असे नामकरण करुन १२व्या शतकातील एक आदर्श प्रशासक म्हणून बसवेश्वर यांचे नाव लौकीक आहे.
जगद्गुरु महात्मा बसवेश्वर यांनी १२व्या शतकात अनुभव मंडपाच्या माध्यमातून समाजामध्ये न्याय, बंधुता, एकात्मता, स्वातंत्र्य अधिकार, शिस्त सुशासन आदि गोष्टीवर परीपूर्ण असे अभ्यास करण्यासाठी अनुभव मंडपाची संकल्पना जगासमोर आणली. यात समाजील सर्व स्तरातील स्त्री-पुरुष यांना सहभाग नोंदविता येत असत त्यामुळे १२व्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभव मंटपा धर्तीवरच नवी दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन संसद भवनच्या इमारतीस अनुभव मंडप असे नामाकरण करून त्याच नावाने ओळण्यात यावे जेणेकरुन आपल्या महात्मा बसवेश्वर यांच्याप्रती असलेली आस्था व त्यांनी घालून दिलेले आदर्शावरच सदरचे अनुभव मंडपाचे कामकाज होईल व त्यांची प्रती खरी श्रध्दा म्हणून त्यांच्या संकल्पनेस समर्पित करता येईल.
यावेळी नूरअहमद नालवार, कल्याणराव चौधरी, श्रीकांत दासरे, मल्लिनाथ सोलापुरे, आकाश तिपरादी, रामलिंग मटगे, शिवानंद गुंडगे, कांचन फाउंडेशन शाखा अध्यक्ष शेखर पाटील, ओमकार पाटील, समर्थ माने, रोहन गायकवाड, आकाश राठोड, विकास कस्तुरे, विशाल तोडकरे , नवनाथ पवार, शेखर दिडेंगावे, सचिन बोराडे आजय पाटोळे, महेश बोराडे, कुमार सुरवसे, अविनाश बोराडे, राम भोसले, ऊमेश सिरसट, मरूती ऊडाणशिवे, आकाश तांबे, आमोल बोराडे, मारूती बनसोडे, निलेश मस्के, शरिफ शेख, अमोल मस्के, सोमा बिदिमनि, विनायक भालेराव, बालाजी सुरते, लखन साळवे हे महासभाचे कार्यकर्ते उपस्थित होते.




















