प्रभाग 26 मधील बंडाप्पा नगर येथे हद्दवाढ झाल्यापासून कुठल्याच सुविधा झाल्या नव्हत्या व सेफ्टीटॅंक ओव्हर फ्लो होऊन घाण पाणी रस्त्यावर येत होते. त्यामुळे सदर नगरामध्ये दुर्गंधी पसरत होती व मलेरिया सदृश्य आजार होत होते. तेथील नागरिक वारंवार सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रारी करूनही कोणीही दखल घेतली गेली नाही.
तेथील नागरिक माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना सदरच्या समस्या बाबतीत निवेदन देऊन पाहणी करण्यासाठी विनंती केली होती. नागरिकांच्या विनंतीला मान देऊन चव्हाण यांनी पाहणी करून सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली-उगले यांना सदर समस्या बाबत निवेदन दिले होते. त्याची दखल घेत तातडीने निधी उपलब्ध करून दिला आहे.
सध्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली त्यामुळे सदर नगरातील नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे. आम्ही जवळपास 25 ते 30 वर्षापासून सदर नगरामध्ये वास्तवास असून आम्हाला फक्त मतदानपुरतेच आश्वासन मिळायचे. एकदाची निवडणूक झाली की, परत कोणीही आमचे नगराकडे फिरकत नव्हते. परंतु नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी फक्त एका निवेदनात आमचा जटिल प्रश्न सोडवला अशा जनतेसाठी धावून येणाऱ्या नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया समोर आल्या
त्यावेळी विजय पगारे, सचिन थोरात, बाळासाहेब जावळे, सिद्धेश्वर जावळे, शरद सुलाखे, सविता ढेगणे, चंद्रकांत भावे, सागर ठेंगील, अमोल हावळे, परशुराम लवटे, विजयकुमार मालपुरी आदीसह सदर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















