मोची समाजाचे नेते करण म्हेत्रे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते ते सामाजिक कार्यकर्ते होते काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक होते त्यांच्या अंत्यविधीला हजारोंचा जनसमुदाय उसळला ही गर्दी पोलिसांना सुद्धा आवरता आली नाही, संतापलेल्या पोलीस प्रशासनाने 250 जणांवर गुन्हा दाखल केला, 50 जणांना अटक केली, त्यांना अंतरिम जामीन झाला,
मात्र अंत्यविधी नंतर पोलिसांनी या भागातील सुमारे दोन किलोमीटरचा परिसर सील करत कंटेनमेंट झोन डिक्लेअर केला , यामध्ये बेडर फुल लोधी गल्लीचा ही समावेश करण्यात आला, लोधी समाजातून प्रचंड असे संतापाचे वातावरण आहे या दोन किलोमीटरच्या परिसरात केवळ एका ठिकाणाहूनच आत येण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला आहे सर्व नागरिकांची कोरूना चाचणी करण्यात येत आहे, पाच दिवस अशी परिस्थिती असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत, महापालिकेकडून स्वच्छता केली जात नाही कचरा उचलला जात नाही त्यामुळे या भागातील महिला नागरिक महापालिकेच्या कारभारावर वैतागले आहेत दरम्यान नगरसेविका जुगनबाई आंबेवाले यांचे पती समशेरसिंग आंबेवाले यांनी महापालिकेच्या कारभारावर तीव्र असा संताप व्यक्त केला, चार दिवस झाले स्वच्छता नाही, कुणी आजारी पडले तर रिक्षा जाण्यासाठी, अंबुलन्स येण्यासाठी जागा नाही, पोलिसांना बोलायला गेल्यास थेट 353 अन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जाते आहे, आम्ही काय आतंकवादी आहोत का? करण म्हेत्रे आणि आमचा काय संबंध असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या भागात राहत असलेल्या महिलांनी सुद्धा आपल्या व्यथा बोलून दाखवल्या. दीड महिने होऊन गेले आमचे हातावरचे पोट आम्ही खायचे काय बिडया बनवून आम्ही घर भागवतो आता ते सुद्धा बंद आहे हे समजत नाही का महापालिका आणि पोलिसांना अशा शब्दात संताप व्यक्त करण्यात येत आहे


















