सोलापूर : महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती येत्या 28 29 व 30 ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहे
गुरुवार 28 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता शासकीय विश्रामगृह याठिकाणी ही समिती येणार असून या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्थळ भेटीचे नियोजन करण्यात येणार आहे त्यानंतर दिवसभरात काही स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत.
शुक्रवार 29 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन ते चार या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस अधीक्षक आयुक्त, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती प्रादेशिक परिवहन कार्यालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित, सोलापूर या आस्थापनवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी कर्मचारी यांची भरती बढती, आरक्षण व अनुशेष याबाबत बैठक होणार आहे.
त्यानंतर चार ते पाच त्याच ठिकाणी कृषी अधीक्षक कार्यालय, पशुसंवर्धन कार्यालय, अधीक्षक जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांचे आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी कर्मचारी यांची भरती, बढ़ती, आरक्षण व अनुशेष याबाबत तसेच सोलापूर जिल्हा जातपडताळणी समिती, समवेत बैठक होईल,
शनिवार तीस ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते बारा जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी/कर्मचारी यांची भरती. बढती, आरक्षण व अनुशेष तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत जिल्हाधिकारी, उपायुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या समवेत बैठक होईल.
दुपारी 12 ते 2 दरम्यान सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील विमुक्त जाती व भटक्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व जमातीचे अधिकारी/कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण व अनशेष तसेच त्यांच्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपायुक्त व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे समवेत बैठक होईल.
दुपारी 3 ते 4 दरम्यान समितीने विविध प्रकल्प व कामांच्या केलेल्या पाहणी दरम्यान समितीच्या निदर्शनास आलेल्या काही प्रमुख बाबींसंदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक.
कोण आहेत या समितीमध्ये
शांताराम मोरे समितीचे अध्यक्ष असून या समिती मध्ये बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत त्यासोबत रोहित पवार,नितीनकुमार देशमुख, इंद्रनील नाईक,बळवंत वानखेडे, सुरेश भोळे, राजू आवळे, विनोद अग्रवाल, आमदार गोपीचंद पडळकर, रत्नाकर गुट्टे, क्षितिज ठाकूर,संजय दौंड, राजेश राठोड, बाळाराम पाटील हे सदस्य आहेत.

















