“समाज घडविण्यासाठी साहित्याबरोबर संस्कृतीची गरज आहे. साहित्यिक हा समाजाचा आरसा आहे. वाचन संस्कृती टिकवुन ठेवण्यासाठी आदर्श काव्य, साहित्य निर्मिती साठी कवी व लेखक निर्माण होण्याची गरज प्रा.डॉ दुष्यंत कटारे यानी सावरगाव येथे बोलताना केले”.
तुळजापूर : रविवारी तुळजापुर तालुक्यातील सावरगाव येथे पंचाशिल तरूण मंडळ व यशोदिप पब्लीकेशन पनवेल आयोजित कवी नागनाथ डोलारे लिखीत मायेचा स्पर्श या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रा डॉ दुष्यंत कटारे, जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, मारूती बनसोडे, सरपंच रामेश्वर तोडकरी व शरद माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
प्रा. कटारे पुढे म्हणाले की वाचन संस्कृती टिकवुन ठेवण्यासाठी ग्रामीण भागात चळवळ उभी राहीली पाहिजे. आजकाल मोबाईलच्या अति वापरामुळे वाचनाकडे दुर्लेक्ष केले जाते त्यामुळे समाज माध्यमावर दुष्पपरिणाम होवू लागलेत याचाही विचार करण्याची गरज आहे. वाचाल तर वाचाल ही संस्कृती निर्माण होणे महत्वाचे आहे असेही प्रा. कटारे यानी सांगितले.👇👇👇👇👇
या कार्यक्रमास हणमंत गाभणे, माजी सरपंच भिमराव कोळी, बाजीराव साबळे, रमेश काडगावकर, अर्चना डोलारे सुनिल फडके, उपसरपंच आनंद बोबडे नागनाथ डोलारे सुरेश फडके, प्रा गोरख पांडागळे, हनमंत फडके, रोहीत पाटील रमाकांत डोलारे, मिलींद सुरेश डोलारे दादा काडगावकर, महेश फडके, सुखदेव कांबळे, वच्छाला फडके, वच्छला डोलारे, कमल फडके, रेखा फडके, पार्वती फडके, प्रभाकर फडके, बाळासाहेब फडके, शिवाजी फडके, दासू फडके, राहुल डोलारे, भीमराव फडके, सोमनाथ फडके, नितीन फडके, नंदकुमार फडके, आदी महीला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक सुरेश फडके, सुत्रसंचालन व आभार हरीश फडके यानी केले.

















