“राज्य घटनेने दिलेल्या अधिकारामुळेच मी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आहे. संविधानाचे उपकार मी विसरणार नाही. आज मला आनंद होत असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांनी सांगितले”.
सोलापूर – सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संविधान दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमचे पूजन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे यांचे हस्ते करणेत आले.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, अतिरिक्त मुख्य लेखा वित्त अधिकारी सुर्वे , कार्यकारी अभियंता कदम, कार्यकारी अभियंता डी एफ कोळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते डाॅ. बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे पुजन करणेत आले. प्रारंभी उद्देश्यीकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी केले.
सर्वांना बोलणेचा, समानतेचा, स्वातंत्र्याचा घटनात्मक हक्क दिला. असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, आपल्याला संविधाना मुळे मिळालेल्या हक्काचा उपयोग चांगले साठी करा. इतरांचे हक्क हिरावून घेऊ नका. आपल्याला अधिकार मिळाले त्याचा उपयोग गरीबांचे कल्याणा साठी करा. राज्यघटना जगातील एकमेव अशी घटना आहे हस्तलिखित स्वरूपात आहे. म्हणूनच संविधान देशाचा आत्मा आहे. असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे म्हणाले, डाॅ. राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते. संविधानामुळे आपणास राहण्याचा, जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. मुलभूत स्वातंत्र्य मिळाले. डाॅ. बाळासाहेब यांना संविधान दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात येत आहे. डाॅ. बाळासाहेब आंबेडकर यांचे मोठे योगदान आहे. असेही धोत्रे यांनी सांगितले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे म्हणाले, भारतीय संविधानामुळे लोकशाही बळकट होणेस मदत झाली आहे.संविधानामुळे जगात भारतीय लोकशाही बळकट आहे. टिकून आहे. असेही शेळकंदे यांनी आपल्या अभ्यासपुर्ण भाषणात सांगितले.


















