मंगळवारची सायंकाळ, पाच वाजताची वेळ,एक महिला कंबर तलावाजवळील पुलाच्या लोखंडी पाईपवर चढत असताना दिसली,रेल्वे पोलीस राठोड यांनी त्या महिलेला वाचवण्यासाठी पळत येऊन झेप घेतली. स्कूटीवरून चाललेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या मनिषा नलावडे यांच्या नजरेस हे दृश्य पडले.क्षणाचाही विलंब न करता मनिषाताईंनी त्या महिलेला धरून ओढले,याच प्रसंगी तिथे हजर असलेले रेल्वेचे पोलीस शिपाई मिथुन राठोड यांनीही समयसूचकता दाखविली.व मदत कार्यात पुढाकार घेऊन त्या महिलेला बाजूला घेताना त्या रस्त्यावरून निघालेले काँग्रेस नेते डाॅ.बसवराज बगले हे थांबले आणि त्या आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेला बाजूला घेण्यात यशस्वी झाले.मनिषा नलावडे यांची नजर त्या महिलेवर पडली नसती तर क्षणार्धात एका जीवाचा बळी गेला असता.तिला वाचविल्याचे खूप मोठे समाधान दोघांच्या चेहर्यावर ओसंडून वाहत होता.
मात्र त्या महिलेला रस्त्यावरून बाजूला घेऊन ऊभे केले तर ती ओक्साबोक्सी रडू लागली.डाॅ.बसवराज बगले आणि मनिषा सुखदेव नलावडे यांनी तिची विचारपूस केली असता ती प्रचंड तणावातून होती,बोलता येत नंव्हते,दरम्यान त्याच रस्त्याने निघालेले साखरपेठ पोलीस चौकीचे पोलीस उपनिरिक्षक श्री.नरसप्पा राठोड यांना ही घटना दिसली,तात्काळ थांबून त्यांनी चौकशी केली.त्या महिलेला धीर दिला.तिला सावरले कर्ताव्यदक्षपणे आपल्या जवळच्या वाॅकीटाॅकी वरून वायरलेस संदेश दिला.अगदी पाच मिनिटांत सदर बझार पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस सौ.मनिषा गायकवाड ( 1420 ) आणि सौ.तांबोळी ( 1823 ) या रणरागिणी दाखल झाल्या.
सर्व जण मिळून त्या महिलेची चौकशी करत होते तर तिला बोलता येत नसल्याने सगळेच बुचकळ्यात पडले,तिचा पत्ता कळेना,नांवही समजेना,ओळखही पटेना,तेंव्हा पोलीस उपनिरिक्षक श्री.राठोड यांनी त्या भगिनींला पोलीस ठाण्यात नेऊन तिला मदत करण्याची भूमिका बजावली.
सदर महिलेची काळजी घेऊन पोलीस ठाण्यात पाठवण्यास मदत केली.आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राजु तुरबे,रसीद शेख आदींनी या कामात सहभाग घेऊन मदत केली.
एका 35 वर्षांच्या ताणावग्रस्त भगिनींला मृत्यूच्या दाढेतून वाचविलेल्या लोहमार्ग पोलीस मिथुन राठोड ( 518 ) सौ.मनिषाताई नलावडे,डाॅ.बसवराज बगले आणि पोलीस उपनिरिक्षक राठोड,यांच्या कर्तव्याचे कौतुक करून गर्दी पांगली.
रात्री 7 च्या पर्यंत त्या महिलेला सदर बझार पोलीस ठाण्यात बसवून तिची सविस्तर चोकशी केली.पोलीस कर्मचारी तमीम हिरापूरे (360) आणि कदम (143) यांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.कमलाकर पाटील यांच्या सूचनेनुसार महिला पोलीस राजश्री माळी (1831) यांच्या मदतीने सदर महिलेला तिच्या बहिणीकडे बुधवार पेठेतील मच्छी मार्केटमध्ये पोलीस वाहनातून सोडले.तोपर्यंत डाॅ.बसवराज बगले आणि मनिषाताई नलावडे पोलीस ठाण्यात उपस्थित होते.व


















