सोलापूर – कामाला देव माना, कर्माला महत्व द्या, ताणतणावामुळे स्वास्थ्य बिघडते, म्हणून ग्रामसेविकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
सिंहगड शिक्षण संकुलात जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग व महिला बाल कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने महिला ग्रामसेवकांसाठी महिला सक्षमीकरण व प्रशासकीय सुधारणा कार्यशाळाघेणेत आली.यावेळी सिईओ दिलीप स्वामी बोलत होते. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, महिला व बाल कल्याण विभागाचे मोहीम अधिकारी जावेद शेख, गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभा साखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी तनपुरे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, व्याख्याता सीता पाटील आदी उपस्थित होते.
सिईओ दिलीप स्वामी यांनी महिला ग्रामसेवका यांचेसाठी खास या महिला सक्षमीकरण कार्यशीळेचे आयोजन करणेत आले होते. योगा, पोहणे, व्यायाम, ध्यान, पायी चालणे छंद जोपासा, सुर्यनमस्कार विविध व्यायामाचे प्रकार सिईओ स्वामी यांनी सांगितले. मनातलं मैत्रिणींशी बोला. कामाचे व वेळेचे नियोजन करा. वाचायला शिका. भावना व्यक्त करायला शिका. संवाद कौशल्य जोपासा. असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
महिलांना दुय्यम स्थान – सुहासिनी शहा
……………………….
महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत अधिक सक्षम आहेत. परंतु समाजव्यवस्थेने त्यांना दुय्यम स्थान दिले आहे. फक्त ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात सुद्धा महिलांना आजही दुय्यम स्थान दिले जाते. महिलांनी स्वतः मध्ये आत्मविश्वास वाढवावा. स्वतःला कधीही दुय्यम समजू नका. महिलांमध्ये धैर्याची कमी नाही. त्या कोणत्याही परिस्थितीस पुरुषांच्या तुलनेत धैर्याने तोंड देतात. ग्रामसेविकांना ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. प्रशासकीय सुधारणांबरोबरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी शहा यांनी व्यक्त केले.
ताणतणाव लक्षात येत नाही – सिईओ स्वामी
…………………..
कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे सांगणारे संत सावता महाराज यांना कामात देव मानला.कामाला महत्व द्या. सकारात्मक रहा, आनंदी रहा असे सांगून सिईओ दिलीप स्वामी म्हणाले, ताणतणाव चे परिणाम लक्षात घ्या. छोटे प्रसंगांतून ताणतणाव निर्माण होतो. प्रेशर कुकर सारखे राहू नका. ताणतणावाचे व्यवस्थापन करा. आरोग्याची काळजी घ्या. महिलांमधील शक्तीची ओळख करून देण्यासाठीच आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागील उद्देश आहे. आमच्या महिला ग्रामसेविका या ग्रामीण भागात काम करताना त्या आत्मविश्वासाने येणाऱ्या प्रत्येक अडचणींना सामोरे जाव्यात. त्यांच्या प्रशासकीय कामकाजांच्या सुधारणे बरोबरच आरोग्याच्या समस्या जाणून घेवून त्याबाबत त्यांच्यात जागृती निर्माण करणे हाही उद्देश या कार्यशाळेचे आयोजन करण्यामागे आहे.
ग्रामपंचायत अधिनियमाचा चांगला. अभ्यास करा – अतिरिक्त सिईओ कोहिनकर
……………..
ग्रामपंचायतीच काम सक्षम पणे करणे साठी नियमांचा अभ्यास करा जेणे करून लोकांना वेळेत सेवा देता येतील असे मत अतिरिक्त सिईओ संदीप कोहिनकर यांनी व्यक्त केले. सरपंचाना अपात्र तोटी कारवाई केले नंतर एप्रिल करणे साठी व पडताळणी साठी किती दिवसाचा कालावधी आहे? ग्रामपंचायतीच् नमुना रजिस्टर,सरपंच व उपसरपंच, मासिक सभा व ग्रामसभेचे अधिकार याबाबत उलट प्रसंगी विचारून मार्गदर्शन केले . परिपत्रक व वरिष्ठ कार्यालयाकडून येणारे पत्रव्यवहार याची काळजीने अभ्यास करा. अतिक्रमणाबाबत नियमांची माहिती करून घ्या. कामात यामुळे अडथळे निर्माण होणार नाहीत. असेही अतिरिक्त सिईओ संदीप कोहिनकर यांनी सांगितले.
अधिकाराची जाणीव ठेवा – शेळकंदे
………………
इशाधीन शेळकंदे म्हणाले महिला ग्रामसेविकांनी आपले कामकाज करताना महिला सरपंच व सदस्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व ग्रामपंचायत कामकाजाविषयी महिती देण्याचे काम प्राधान्याने करणे गरजेचे आहे. आपल्या अधिकाराची जाणीव झाल्याशिवाय महिला खऱ्याअर्थाने सक्षम होणार नाहीत.
प्रास्ताविक जिल्हा मोहीम अधिकारी जावेद शेख यांनी केले. सुत्रसंचलन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव व अंगणवाडी पर्यवेक्षिका माधवी शिंदे यांनी केले. कार्यशाळेच्या नियोजनासाठी गोपाळपूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी परिश्रम घेतले.


















