राज्यात सध्या “ईडी”च्या चौकशी वरून ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांची डोकेदुखी झाली आहे, जयंत पाटील यांच्यावर ही ईडीच्या डोळा आहे, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना इडीच्या चौकशी वरून प्रश्न विचारला असता ईडी ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्यानुसार वागते हे अनेक प्रकरणावरून सिद्ध झाले आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्याला आता ज्ञात झाले आहे की राज्यातील सरकार पाडण्यासाठी जे काही शक्य आहे ते भाजप करत आहे. त्यासाठी ईडी आणि सीबीआय या संस्था आमच्या राज्यातील विरोधी पक्षाची सल्लामसलत करून कार्यवाही करतात असा थेट आरोप जयंत पाटील यांनी सोलापुरात केला
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...


















