‘जल्लोषी माहोल अन् मोदी करिष्म्याची जादू’ ; सोलापुरातील सभेला नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद ; संविधान व आरक्षणाला धक्का लागणार नाही ही गॅरंटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आजची सभा सोलापुरातील भाजप कार्यकर्त्यांना ‘चार्ज’ करणारी ठरली. मोदी यांचे प्रभावी भाषण कार्यकर्त्यांना भारावून सोडणारे होते. इथला पूर्ण माहोल ‘मोदीमय’ झाला होता. उपस्थित लाखो नागरिक व कार्यकर्ते ‘मोदी मोदी’ असा जयजयकार करत होते. भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन झाले.
मोदी म्हणाले, सोलापूरमध्ये दुसऱ्यांदा आलोय, त्यावेळेस काही देण्यास आलो होतो, आता काही तरी मागायला आलो आहे, कारण नंतर मी खूप काही देणार आहे, मग पैसा नको आहे फक्त आशीर्वाद द्या, या निवडणूक नंतर पुढील पाच वर्षात विकासाची गॅरंटी मिळणार आहे,
दुसरीकडे इंडी आघाडी आपल्या कलंकित स्वभावाने देशाची सत्तेचे स्वप्न पाहत आहे मात्र त्यांच्या स्वप्नांचा डब्बा गुल झाला आहे, तुम्ही दहावर्ष मला पाहिले आहे, माझे सर्व निर्णय पहिला आहे, काम पाहिले आहे, इंडी आघाडीत नेतृत्वाच्या नावावर भांडण सुरू आहेत. ज्यांच्याकडे ध्येय नाही, अशाकडे देशाची सत्ता देणार आहेत का? पाच वर्षात पाच प्रधानमंत्री हे कसे चालणार, नकली शिवसेना वाले बोलत आहेत त्यांच्याकडे तर pm साठी अनेकांना स्वप्न पडत आहेत.
त्यांना देशाच्या भविष्याची चिंता नाही, त्यांना मलई खायची आहे, हा महाराष्ट्र महान संतांची भूमी आहे, महात्मा फुले, आंबेडकर सारखी महान व्यक्ती या राज्याने दिली, तुम्ही दहा वर्ष मोदींची कामे पाहिली आहेत. पण काँग्रेसने साठ वर्षांत sc St वर्गाच्या लोकांना मोठे होऊ दिले नाही, पण मोदींचा तुमच्याशी सहदय नाते आहे, अहमदाबाद मध्ये पद्मशाली समाजाची लोक आहेत ना त्याचे मी अन्न खाल्ले आहे, obc ना आम्ही संविधनिक दर्जा दिला, त्याचा उन्नतीचे निर्णय घेतले, कुणाचे ही हक्क हिरावून घेतला नाही, सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काम केले आणि करणार आहे.
देशात इंजिनिअरिंग मध्ये शिकणाऱ्या साठी गरीब मुलांना डॉकटर आणि इंजिनियर करायचे आहे, त्यासाठी आता डॉक्टर आणि इंजिनियर हे शिक्षण मराठी तून देणार आहोत.
दलीत, आदिवासी, ओबीसी यांच्या नेत्यांना मोठ होऊ दिले नाही, बाबासाहेबांना पण उशिरा भारतरत्न देण्यात आला,पण आम्ही त्यांचा सन्मान ठेवत दलितांच्या व्यक्तीला राष्ट्रपती बनवले, त्यानंतर आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवले.
आज केंद्रीय मंत्रीमंडळ मध्ये साठ टक्के लोक ओबीसी आणि दलीत नेते आहेत, इंडी आघाडी वाले आज अपप्रचार करीत आहेत, त्यांच्या भाषणात मुद्दे नाहीत, फक्त मोदींना शिव्या देण्याशिवाय काही नाही, त्यांच्याकडे व्हिजन नाही पण आमच्याकडे जीवन आणि व्हिजन आहे .
आता संविधान बदलेल, आरक्षण संपेल, असा प्रचार केला जातो, आज बाबासाहेब आंबेडकर असते तर ते पण संविधान बदलता आले नसते, हा मोदी काय चीज आहे.
आरक्षणाला जेवढी ताकद देऊ शकतो ती माझ्याकडे आहे, आज मी फक्त तुम्हाला मागत आहे, मला साथ द्या, आशीर्वाद द्या आणि मला मजबूत करा.