उत्तर सोलापूर तालुक्यातील गावातल्या श्री.म्हसोबा यात्रेच्या पूर्व पूर्वसंध्येला तिर्हे ग्रामपंचायतच्या वतीने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या “घंटागाडी”चे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी सरपंच नेताजी सुरवसे, सोसायटी चेअरमन भास्कर सुरवसे, उपसरपंच मारुती लवटे, अजय सोनटक्के, गोवर्धन जगताप, शिवाजी सुरवसे, हंसध्वज जाधव, पार्थवीर सुरवसे, शिवाजी जाधव, सुभाष वसपटे, दामोदर पिसे, संजय राठोड, गुरुदेव गायकवाड, भागवत गायकवाड, खराडे, गोविंद सुरवसे, उमेश सोनटक्के, प्रदीप सुरवसे, बालाजी गायकवाड आदी उपस्थित होते.
गावात कचरा व्यवस्थापनसाठी घंटागाडीची सोय झाल्याबद्दल समस्त महिला वर्गांनी समाधान व्यक्त केले व त्यांची कचरा टाकण्याची व्यवस्था झाली.



















