प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास रुपये २०००/- प्रती हप्ता याप्रमाणे रुपये ६०००/- प्रती लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून २०२३ मध्ये जमा होणार असून केंद्र शासनाने १४ व्या हप्याया लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.
सोलापूर जिल्हयामध्ये सद्यस्थितीमध्ये एकूण १ लाख ९२ शेतकरी लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत तसेच १,४१,३७० लाभार्थ्यांनी पीएम किसान खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे सदर लाभार्थ्यांना १४ व्या हत्याचा लाभ जमा होणार नाही. तसेच वारंवार संपर्क करूनही लाभार्थी ई-केवायसी करत नसल्यास तशी नोंद दफ्तरी घेण्यात येऊन संबंधित लाभार्थ्यास अपात्र मार्क करणेबाबतही सुचना प्राप्त झालेल्या आहेत.
लाभार्थ्यांना त्यांचे बैंक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट कार्यालयात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आधार कार्ड, मोबाईल नंबर या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांचेमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपले आधार क्रमांकाशी ४८ तासामध्ये जोडले जाईल. सदरची पादत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये बँक खाते गुरु करण्याची सुविधा आपले गामातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही,
पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये उधळून ती आधार क्रमांकाश यासाठी प्रत्येक तालुक्यास तसेच जिल्हा पोस्ट कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लानाना संपर्क करून आयपीपानी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार सलग्न बैंक खाते अनिवार्य कलेले असल्याने इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत दिनांक ०१ मे २०२३ ते १५ मे २०२३ या कालावधीत यासाठी गावपातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये जिल्हयातील सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे खाते उचावे आणि आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहान करण्यात येत आहे..



















