सोलापूर – पहिल्यांदा पाऊस चांगला पडल्याने खरीप पेरलो… तर पून्हा पावसाने ओढ दिली त्यामुळे राहिलेलं हाता- तोंडाशी येण्याची आशा धो-धो पावसाने धूवून गेली, मॅडम तुम्हीच सांगा… आम्ही कसं जगायचंअशी भावना कळमण,कौठाळी,साखरेवाडी गावातील शेतकऱ्यांनी व्यक्त़ केलेली भावना मन हेलावून टाकणारी ठरली.
उत्त़र सोलापूर तालुका कृषी अधिकारी मनिषा मिसाळ या कळमण, कौठाळी, साखरेवाडी भागात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी गेल्या यावेळी शेतकऱ्यांनी आपली भावनीक गाऱ्हाणी मांडली. बियाणे, खते, औषधे महाग, मजुरी वाढली. तेही मिळत नाहीत. कुंटूबातील सर्व राब-राबून कष्ट़ करतोय आम्ही… प्रांरभी चांगला पाऊस झाला म्हणून मोठया आशेने खरीपाची पेरणी केली. पून्हा एवढी ओढ दिली की 50 टक्केपेक्षा जास्त़ पिके जळून गेली. पून्हा आलेल्या पावसाने राहीलेली पिके हाताशी आली. तर धो-धो पावसामुळे डोळयादेखत वाहून गेली. आता तुम्हीच आम्हाला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी काहीतरी करा असे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी अतीपावसामुळे दोडका, कारली, मिरची, द्राक्ष, तूर,सोयाबीन, मका, कांदे,दोडका,सिमला मिरची,हिरवी मिरची,आदि भाजीपाला, पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगीतले तर अनेक पिकातून पाणी वहात असल्याचे दखवले.. आपल्या भावना आमचे वरीष्ठाकडे व शासनापर्यंत पोहचवू असे कृषी अधिकारी मिसाळ यांनी सांगितले यावेळी नान्नज मंडल कृषी सहाय्यक़ कृष्णात थिटे,या गावातील कृषी सहाय्यक,कळमणचे सरपंच, पांडूरंग लंबे,उपसरपंच सुनिल पाटील, साखरेवाडीचे उपसरपंच पप्पू साखरे, शिवानंद व्हनमूटे प्रकाश गावडे, नंदू व्हनमूटे, वैजिनाथ लंबे.आदि उपस्थित होते.
कळमण येथे स्वंयमचलीत पर्जन्य मापक बसवा-सुनिल पाटील कळमण,कौठाळी भागाईवाडी, साखरेवाडी भागात जास्त 75 मि.मी. पाऊस होऊनही वडाळा येथे असलेल्या पर्जन्यमापकात 65 मि.मि.नोंद आहे.तरी या भागातील गावातील पडलेला वस्तूनिष्ठ पाऊस मोजमाप करण्यासाठी कळमण येथे स्वंयचलीत पर्जन्यमापक बसवण्याची मागणी कळमण येथील शेतकऱ्यांनी केली


















