अक्कलकोट : यंदाच्या गळीत हंगामाचे ऊस बिल डिक्लेअर केल्याशिवाय कोणत्याही कारखान्याला एक कांडी देखील ऊस देणार नाही यासाठी गावोगावी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी आपल्या आक्रमक भूमिका कारखानाच्या विरोधात घेतल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील खानापूर, मैसलगी, अंकलगी, गुड्डेवाडी, पानमंगरूळ त्या गावात शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांची आर्थिक अडचण समजून घेण्यात आल्या. यावर्षी होणाऱ्या ऊस गाळप हंगामात शेतकऱ्यांना शासनाच्या ठरलेल्या एमआरपी प्रमाणे एक रकमेत बिल व दर मास्टर प्रमाणे बिल देणाऱ्या कारखान्याला ऊस देणार, जो कारखाना शासनाच्या एफआरपी प्रमाणे बिल देत नाही तो कारखाना सगळे शेतकरी मिळून चालु देखील करू देणार नाही अशी भूमिका शिवसेना तालुका उपप्रमुख सैपन पटेल, भीमाशंकर बिराजदार, सुनील खेड यांनी घेतली.
यावेळी मंगरूळचे सरपंच जमादार, हनुमंत पुजारी, पैलवान शहनवाज पटेल, अडवेप्पा भतकुणकी, भीमाशंकर हंद्राळ, अंकलगीचे सरपंच अंबणा विजापूरे, गुड्डेवाडी सरपंच अनिल पाटील, शेतकरी सिद्धाप्पा बंडगर, बसवराज इंडे, विठ्ठल विजापूरे, सिद्धू विजापूरे, संजू विजापूरे, मौलाना शेख, ईमु मकानदार यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


















