सोलापूर शहरात सध्या हे कार्यालय विजापूर रोड वरील आदित्य नगर भागात आहे. मात्र सध्या आरटीओ कार्यालयाचा परिसर पाहिला तर धुळीने माखलेला आणि अस्वच्छतेच्या गर्तेत दिसून येईल आत प्रवेश केल्यावर आतील कॅम्पसमध्ये एक ही चांगला रस्ता नाही, आत येणाऱ्या वाहनांसाठी व्यवस्थित पार्किंगची व्यवस्था नाही, कोण कुठेही वाहने लावतात, जप्त केलेली वाहने तशीच पडून आहेत. मुख्य कार्यालयाच्या परिसरात गुटखा तंबाखू खाऊन थूकलेले चित्र पाहायला मिळेल, आत प्रवेश केल्यानंतर तुटलेल्या खुर्च्या, धुळीने माखलेल्या फरश्या व भिंती पाहायला मिळतील.
सर्वत्र चित्र पाहिले तर किती दिवसांपासून या कार्यालयाची स्वच्छता आणि साफसफाई झाली का नाही? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडेल. आर्थिक उलाढाल मोठी असतानाही कार्यालयाच्या स्वच्छतेकडे व साफसफाई कडे लक्ष का दिले जात नाही हा मोठा प्रश्न आहे.
महिला जेव्हा अधिकारी म्हणून येतात तेव्हा त्या कार्यालयाला ‘घरपण’ मिळतं सोलापूर शहरात मनीषा आव्हाळे या आयएएस अधिकारी आल्या त्यांच्याकडे आदिवासी प्रकल्प विभागाची जबाबदारी आहे, सुरुवातीला हे कार्यालय सोलापुरात कुणालाही माहीत नसलेल्या भागात होते मात्र आता त्यांनी हे कार्यालय तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्या कॅम्पस मध्ये अतिशय सुंदर आणि नेटक्या स्वरूपात केल्याने आदिवासी कार्यालयाला “घरपण” आले त्याच धर्तीवर सध्या अर्चना गायकवाड या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत त्या कार्यालय स्वच्छता आणि परिसरातील साफसफाई कडे लक्ष देणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

















