सोलापूर : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे आणि शिक्षण दर्जा सुधारण्याचे काम महाआघाडीला शक्य नाही, मात्र विद्यापीठ सुधारणा कायदा म्हणत विद्यापीठांना राजकारणाच्या दावणीला बांधण्याचे काम आघाडी करत असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी केला. (Vikas Waghmare, district general secretary of Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM), alleged that the BJP was not in a position to improve the quality of education of students and the quality of education.)
लोकशाहीचे धिंडवडे काढण्याचे काम आघाडीने भर विधानसभेत केले आहे, जे विधेयक सभागृहात आणले त्यावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्यातल्या त्रुटी आणि सूचना सांगत होते मात्र ते न ऐकून घेता गोंधळ करत ते चर्चा न करता पारित केले. स्वायत्त असणारी विद्यापीठे राजकारणाचा अड्डा होणार आहेत, गुणवत्तेच्या आधारे होणारी कुलगुरूंची निवड आता राज्य सरकार करणार म्हणजे राजकीय लागेबांधे आले,प्र कुलगुरू पद तयार करून थेट शिक्षणमंत्र्यांना शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करण्याचे अधिकार या माध्यमातून देण्याचा घाट घातला आहे.
आजपर्यंत गुणवत्तेच्या आधारे मिळणारे प्रवेश आता वसुली आणि पैशाच्या जोरावर मिळू लागतील आणि खरा सामान्य गुणवत्ताधारण विद्यार्थी दूर फेकला जाईल, त्याच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर विद्यापीठाच्या करोडोंच्या जमिनी आणि पैशावरसुद्धा महाआघाडीचा डोळा आहे, हा कायदा लागू झाला तर शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा तो दिवस असेल म्हणून हा डाव भारतीय जनता युवा मोर्चा हाणून पाडण्याचे काम करेल असेही भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी सांगितले.
येणाऱ्या काळात पत्राच्या माध्यमातून, मेसेज, फोन कॉल आणि इमेलच्या माध्यमातून शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही जागे करणार आहोत, तरीही तो कायदा मागे घेतला नाही तर मात्र सरकारला ज्या भाषेत सांगायचे त्या भाषेत सांगण्याची भाजपा युवा मोर्चा सोलापूर जिल्ह्याची तयारी असल्याचा इशाराही जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी बोलताना दिला.

















