सोलापूर : भारतीय सैन्य दलाचे कंत्राटीकरण करून देश व युवा विरोधी अग्निपथ योजना लागू करणाऱ्या मोदी सरकार विरोधात सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने रेल्वे स्टेशन चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या पायथ्याला एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमागड्डी, माजी नगरसेवक विनोद भोसले माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे, माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे, माजी नगरसेवक नरसिंग कोळी, माजी नगरसेविका अनुराधा काटकर, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, प्रदेश सचिव मनीष गडदे , माजी नगरसेवक चेतन नरोटे, आरिफ शेख, शिवा बाटलीवाला, शकील मौलवी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, श्रुतिका तूप्पद, हाजीमलंग नदाफ, शहर मध्य अध्यक्ष वाहिद बिजापुरे, मीडिया जिल्हाध्यक्ष तिरुपती परकीपंडला, नूरमहंमद नालवार, एन के क्षीरसागर, वैष्णवी करगुळे, विनोद गायकवाड, मेकाले गुरुजी, केशव इंगळे, अनंत म्हेत्रे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली अग्निपथ योजना ही भारतातील युवकांना बेकारीच्या खाईत घेऊन जाणारी आहे. या योजनेला संपूर्ण देशभरातून विरोध होत असतानाही त्यांनी ही योजना मागे घेतली नाही. यावरून त्यांना देशातील युवकांच्या आत्महत्या पाहायच्या आहेत का असा थेट सवाल केला. पहा काय म्हणाल्या प्रणिती शिंदे..

















