सोलापूर, दि.१३- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांचे दक्षिण सोलापूरच्या सहकार क्षेत्रात असलेले वर्चस्व मोडीत काढण्यासाठी त्यांच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १४ सोसायट्यांच्या चौकशीची मागणी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली होती. त्याला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली.
हसापूरे यांनी मोहिते-पाटील यांच्या नावाने विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या 14 सोसायट्या स्थापन करून त्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा पतपुरवठा केला आहे. या संस्था अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करीत असताना वेळोवेळी या संस्थांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी या संस्थांच्या आर्थिक कारभाराची चौकशी पूर्ण केली आहे.
या संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबतचा दावाही यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाला होता. परंतु न्यायालयात या संस्थांच्यावतीने सक्षम बाजू मांडल्यानंतर त्यांचा दावा नामंजूर झाला होता. ही वस्तुस्थिती असताना आमदार सुभाष देशमुख यांनी हसापुरे यांचे सहकार क्षेत्रातील वर्चस्व रोखण्यासाठी त्यांच्या 14 सहकारी संस्थांच्या चौकशीची मागणी सहकारमंत्री अनिल सावे यांच्याकडे केली होती. या संस्था बोगस असून त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आमदार देशमुख यांचे म्हणणे आहे.
त्यावरून सहकार विभागाने या संस्थांची चौकशी सुरू केली होती. त्या विरोधात 14 सोसायट्यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देऊन चौकशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
सहकार खात्याने सुरू केलेल्या चौकशीला न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी शुक्रवारी स्थगिती दिली आणि सहकार विभागाने चार आठवड्यात लेखी म्हणणे सादर करावे असा आदेश दिला आहे.
2007 साली संस्था नोदणीला रितसर सहकार आयुक्त यांनी मंजुरी दिल्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेने त्या 14 सोसायटीतील शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपये कर्ज वाटप आजतागायत केलेले आहे. व आतापर्यंत कर्ज घेणे, फेडणे व्यवस्थित चालु आहे. याबाबत माजी आमदार रतिकात पाटील पण अधिवेशनात प्रश्न उपस्थित केलेले होते. त्यावेळेही ते वरील विषय फेटाळून लावण्यात आला. तद्नंतर शिवदारे यांनी कोर्टात याचीका दाखल केली होती ते पण फेटाळून लावत हसापुरे यांच्या बाजुने निकाल झालेला आहे. त्यानंतर पुन्हा सहकार मंत्री असताना सुभाष देशमुख यांची पण तक्रार कोर्टात पेंडीग आहे. आता परत आमदार देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा राग मनात धरून परत तक्रार केलेली आहे. तरी आतापर्यंत वरील 14 सोसायटीचे ऑडीट झालेला असून नियमानुसार निवडणूक ही पार पडलेल्या आहेत. सध्या वसुली वाटप व्यवस्थित सुरु आहे. राजकीय सुबुद्धीने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये ही अपेक्षा आहे. -सुरेश हसापुरे