मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना यामधून सर्वसामान्य आणि मागासवर्गीय नागरिकांना स्वतःचे हक्काचे घर मिळत आहेत. मात्र अनेक लाभार्थी पंधरा ते वीस वर्षा पासून शासनाच्या गावठाण हद्दीत राहत आहेत. नवीन घरकुल यादीत नाव आलेल्यां पैकी अनेकांना स्वतःच्या हक्काची जागा नाही. त्यांना भोगवटदार म्हणून ग्रामपंचायत मध्ये मालकीचा उतारा मिळवून त्यांना हक्काचे घर मिळवून द्यावे अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रसिद्धी प्रमुख आणि कोरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम म्हमाणे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेतून सर्वसामान्य नागरिकांना आणि मागासवर्गीयांना घरकुले मंजूर झाली आहेत. मात्र यातील अनेक लाभार्थी यांना स्वतःची जागा नाही ते शासनाच्या गावठाण ग्रामपंचायतच्या हद्दीतील जागेमध्ये पंधरा ते वीस वर्षापासून झोपड्या टाकुन रहात आहेत व त्यांचा ग्रामपंचायत मध्ये भोगवटदार म्हणून मालकीचा उतारा देखील निघत आहे तरी देखील त्यांना या घरकुलाचा लाभ मिळत नाही. यामुळे अनेक मागासवर्गीय आणि नागरिकांना हक्काची जागा नसल्याने त्यांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न अपुरे राहत आहे. यामुळे २००५ पूर्वी शासनाकडून गावठाण हद्दीतील घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायतच्या परवानगीने त्यांना भोगवटदार म्हणून घरकुल बांधण्यास परवानगी देत होते. त्याच पद्धतीने आता सुद्धा ग्रामपंचायत हद्दीतील किंवा शासनाच्या जागेतील घरकुल बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी गोरगरिबांच्या हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न पूर्ण करावे. या प्रकारचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रसिद्धीप्रमुख आणि कोरवलीचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धाराम म्हमाणे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


















