सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना भीमसैनिकांना शुभेच्छा द्यायला वेळ नाही ; आनंद चंदनशिवे यांची नाराजी
सोलापूरच्या ऐतिहासिक भीम जयंतीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हयातीमध्ये असल्यापासून या सोलापूर शहराला आंबेडकर विचाराचा एक वेगळा वारसा आहे. भव्य मिरवणुकीस जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शुभेच्छा सुद्धा दिलेले नाहीत. याची खंत वाटते परंतु यापूर्वीचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, दत्तामामा भरणे, सोलापूर जिल्ह्यातील आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, विधानसभेचे उपाध्यक्ष पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांनी वेळ काढला. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी वेळ काढायला पाहिजे होता अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी व्यक्त केली.