सोलापूर : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कौतम चौकातील बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभिकरणं कामाला अखेर,बसवेश्वर जयंतीच्या पार्श्वभूमीवर हिरवा कंदील मिळाला असून भाजप नेते जगदीश पाटील व बसवेश्वर सर्कल संघटनेच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
कौतम चौकातील बसवेश्वर पुतळा परिसर अनेक वर्षांपासून पदमगोंडा कुटुंबीय व बसवेश्वर सर्कलच्या वतीने दर रविवारी पूजन व स्वचछता ठेवण्याचे काम करत असताना,त्यांनी पुतळा परिसर सुशोभिकरणं बाबत आपली व्यथा जगदीश पाटील यांच्यापुढे मांडली व पाटील यांनी सोलापूर शहर स्मार्ट होत असताना, समस्त वीरशैव समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या बसवेश्वर महाराजांचा पुतळा परिसर देखील स्मार्ट व्हावा या करिता सुरुवातीला नगरसेवक अमित पाटील यांच्या निधीतून पुतळा परिसर सुशोभिकरणं करण्याचे काम केलं व प्रशासकीय राजवट लागल्याने निधी अपूर्ण पडत असल्याने,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या समवेत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व पुतळा परिसर सुशोभिकरणं करणे करिता आपण निधी द्यावा याकरिता त्यांना विनंती केली व याबाबत मुंबईत देखील जगदीश पाटील, बसवेश्वर सर्कलचे गुरुराज पदमगोंडा, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला,व विखे पाटील साहेबांनी आयुक्त शीतल तेली उगले यांना, तात्काळ जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.
पालकमंत्री यांच्या आदेशानंतर महापालिकेकडून पुतळा परिसर सुशोभिकरणाचे नकाशा तयार करून, त्याला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यामुळे बसवभक्तांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे व जगदीश पाटील यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की पालकमंत्री विखे पाटील यांना आम्ही पहिल्या भेटीत ज्यावेळी हा विषय सांगितलं त्याच वेळी त्यांनी सकारात्मकता दाखवत “जगदीशजी आपण निश्चित राहा मी स्वतः या कामाच्या उदघाटनाला येणार असून याकरिता निधी कमी पडू देणार” ही ग्वाही सोलापूर व मुंबईच्या भेटीत त्यांनी दिली होती व आमची ही मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचा भव्य दिव्य सत्कार आम्ही बसवेश्वर सर्कलच्या वतीने करणार आहोत.
पालकमंत्र्यांनी बसवभक्तांच्या भावनेचा विचार करत तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी नगरसेवक जगदीश पाटील, बसवेश्वर सर्कल संघटनेचे गुरुराज पदमगोंडा, सागर अतनुरे, आशिष दुलंगे, अक्षय अंजिखाने, विनोद गडगे, भागेश ख्याडे, चिदा बगले व सर्व पदाधिकारी यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले


















