सोलापूर : 2014 मध्ये काँग्रेस पक्षाची देशात आणि राज्यातून सत्ता गेली, 2019 मध्ये ही देशात पुन्हा भाजप सत्तेवर आले, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मरगळ आली, सोलापूरात शिंदे साहेबांचा दोन वेळा पराभव हे तर सोलापूरच्या काँग्रेसचा सर्वात वाईट काळ, अनेकजण पक्ष सोडून गेले, नवे कुणी येईना.मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याने खरे तर काँग्रेसला उर्जितावस्था मिळाली. सोलापूरात आमदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम चालत आहे. यामध्ये युवा नेते सुदीप चाकोते यांनी बाजी मारली आहे. कुणाच्या ध्यानी मनी नसताना थेट राहुल गांधी यांच्या कडूनच सेवादल यंग ब्रिगेडचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पद आणले. ही सोलापूर साठी अभिमानाची गोष्ट होती . वाटेत त्यांनी कोणता स्पीडब्रेकर न घेता असा शॉर्टकट मारला की सर्व बघतच राहिले. या निवडीबद्दल सुदीप चाकोते यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सोलापूर शहरात ही ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते सुदीप यांचा सत्कार झाला, यावेळी सुदीप यांनी आपल्या भाषणात भीमगर्जना केली, साहेब मला, जबाबदारी द्या, एका मतदारसंघाची द्या, तालुक्याची द्या, शहराची द्या, जिल्ह्याची द्या, वाटेल तर राज्याची द्या,पण द्या कुणालाही एक पैसा मागणार नाही, स्वतः खर्च करेन पण रिझल्ट दाखवेन. एवढं धाडस सुदीप चाकोते यांच्यात निर्माण झाले आहे. आणि याच धाडसाची काँग्रेसला आताच्या परिस्थितीत गरज आहे. कोरोना काळात सुदीप चाकोते यांनी कांचन फाउंडेशनच्या माध्यमातून मोठे सामाजिक कार्य केले, हजारोना मदत केली, आरोग्याची काळजी घेतली, सहकार्य केले आहे. विविध शिबिरे, उपक्रम राबविले आहेत.
आगामी काळात सोलापूर महापालिकेच्या निवडणुका होत आहेत, शहर उत्तर या मतदारसंघात काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही, महेश कोठे यांच्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आहेत, आता उत्तरमध्ये सुदीप चाकोते यांच्यासारख्या युवा नेतृत्वावर पक्षाने जबाबदारी देण्याची गरज असल्याची पक्षात चर्चा आहे, एकट्या आमदार प्रणिती ताई किती पळणार,जबाबदाऱ्या निश्चित झाल्या पाहिजे असे कार्यकर्ते म्हणत आहेत.
काँग्रेस पक्षाने मागील काही दिवसापूर्वी प्रदेशच्या निवडी केल्या त्यामध्ये विशेष करून धनगर समाज आणि लिंगायत समाजाला प्राधान्य दिले आहे सोलापूर शहरांमध्येही लिंगायत समाजा कडे सध्या महत्त्वाची पदे आहेत त्यामुळे 2017 च्या महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस पासून दूर गेलेला लिंगायत समाज पुन्हा या निवडणुकीत पक्षाकडे आणण्याची मोठी जबाबदारी चाकोते तसेच वाले यांच्यावर आहे.





















