सोलापूर : पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी नेहमी सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात हे सर्वश्रुत आहे. मात्र ही वेळ निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या वर येणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे. फिर्याद दाखल करूनही मुख्य आरोपीस अटक केली जात नाही. त्याच्या अटकेची मागणी घेऊन मालोजीराव माधवराव पाटील हे करीत आहेत.
दस्तूरखुद्द भावाने, वडिल आणि नातेवाईकांनी जवळपास 96 लाखाची फसवणूक करूनही या प्रकरणातील प्रमुख आरोपी अद्याप पोलीसांच्या जाळ्यात सापडलेला नाही . या प्रकरणातील मुख्य आरोपी आजही उजळ माथ्याने फिरत आहे. आणि करमाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी मात्र त्याचा शोध घेत आहेत. मालोजी पाटील आपल्या अनुभवाच्या जोरावर आरोपीचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांना मदत करत आहेत. मात्र अद्याप त्यात यश मिळाले नसल्याने यामागचे कारण समजत नाही.
निवृत्त पोलीस अधिकऱ्याच्याबाबतीत न्यायासाठी विलंब होत असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचे? अशी कुजबूज स्थानिक ग्रामस्थात होत आहे. यानिमित्ताने उपस्थित रहात आहे. विशेष म्हणजे या सेवानिवृत्त सहा पोलीस आयुक्तांच्या तक्रारीची दखल घेऊन राज्याचे गृहमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर .तसेच सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी तातडीच्या कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी करमाळ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्याकडे या प्रकरणाचा तपास पाठवला आहे. प्रकरणातील मुख्य आरोपीला अद्याप अटक होत नाही हे कोडे मात्र न उलगडणारे आहे.
या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पोलीस दलातून सहा. पोलीस आयुक्त या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या मालोजी माधवराव पाटील 59 रा. बालेवाडी पुणे .मुळगाव केतुर 2 तालुका करमाळा यांचे कुटुंबातील व नातेवाईक मंडळीनी ९६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी लखोजी माधवराव खाटमोडे, माधवराव तुळशीराम खाटमोडे, राणी लखोजी खाटमोडे रा. तिघे केतुर तालुका करमाळा. तसेच सुनील माणिकराव नलावडे, मीरा सुनील नलावडे दोघे रा. लवूळ तालुका माढा याच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे.
या कालावधीमध्ये सन 2011 ते 2019 पर्यंत च्या कालावधीमध्ये पाटील यांच्या खात्यावर साखर कारखाकडून जमा असलेल्या रकमेचा खोट्या व बनावट सह्या करून रोखीने तसेच इतर खात्यावर पैसे वळवुन भाऊ लखोजी माधवराव खाटमोडे, माधवराव तुळशीराम खाटमोडे यांनी ९६ लाख ३९ हजार रुपयांचा अपहार केला असा त्यांनी खात्रीशीर आरोप केला आहे .त्याचे लेखी पुरावेही पोलीस ठाणेत सादर केले आहेत.
आपहार केलेल्या रकमेतून लखोजी खाटमोडे यांनी बारामती येथे सदनिका खरेदी केल्याचे तसेच अज्ञात गावी 20 ते 25 एकर जमीन खरेदी केल्याचे खात्रीशीर समजते. तसेच त्याची पत्नी राणी लखुजी खाटमोडे हीचेसाठी बारामती येथील तसेच केतूर येथील सोनाराकडून पन्नास ते साठ तोळे सोने खरेदी केल्याची माहिती मिळते, व केतुर या गावी मारुती विठ्ठल येडे ,राजाराम विठ्ठल येडे व शहाजी विठ्ठल येडे यांचा प्लॉट खरेदी केल्याचे तसेच टाटा हरिहर जीपही खरेदी केली आहे. असे या तक्रारीत म्हटले आहे. परंतु अद्याप पर्यंत पोलिसांनी काहीही जप्त केलेले नाही .तसेच लखोजी व माधवराव यानी अपाहार केलेल्या रकमेतील काही रक्कम हे मिरा सुनील नलावडे हिला व तिचे पती सुनील माणिकराव नलावडे दोघे रा.लउळ ता.माढा यांना घर बांधण्यासाठी दिल्याचे खात्रीशीर समजल्याचे नमूद आहे.
तकार दाखल होऊन 8 दिवस झाले तरी अद्याप आरोपी अटक झाले नाहीत. विशेष बाब म्हणजे आरोपी लखोजी,माधवराव, व राणी यांच्यावर करमाळा पो ठाणेत फिर्यादीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कलम 307,326,327, चा गुन्हा दाखल आहे … सदर गुन्ह्यात वरील आरोपींना वैद्यकीय कारणास्तव अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला असून मुख्य आरोपी लखोजी खाटमोडे पाटील अडीच महिन्यापासून फरारी आहे. त्याला आसरा देणाऱ्या व्यक्ती शोधल्यास लखोजीचा माग काढणे शक्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .


















