सोलापूर : भारतात काँग्रेस पक्ष स्थापन होऊन 137 वर्षे पूर्ण झाले. त्या स्थापना दिनानिमित्त सोलापूर शहरातील काँग्रेस भवनामध्ये ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली.
यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलतच राहणार आहेत, मी मुख्यमंत्री असताना सीमावाद सुप्रीम कोर्टात पाठवला, महाराष्ट्राने स्पष्ट भूमिका घ्यावी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत याचा अर्थ त्यांना आणखीन कार्यकाळ पूर्ण करायचा आहे अशी टीका त्यांनी केली. यापुढे लोकसभा लढविणार नाही, पण पक्षात सक्रिय राहणार आहे.
पक्षाच्या वाटचालीवर बोलताना ते म्हणाले, काँग्रेसला कधी सत्ता येते, येत नाही, काँग्रेसच्या वाटचालीमध्ये तीन-चार वेळा सत्तांतर झाली आहे, तरीपण काँग्रेस टिकली, सोनिया गांधी यांच्यासारख्या नेत्या ज्या परदेशी असूनही काँग्रेस नेटाने चालवली आहे. म्हणून कधी काँग्रेस संपणार नाही असा दावाही त्यांनी केला.
–
–





















