सोलापूर – केंद्र व राज्य शासन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाची कामे निश्चित करून देत आहेत. २ आॅक्टोबर पासून कामे सुरू न झाल्यास गटविकास अधिकारी यांचेवर जबाबदारी निश्चित केली जाईल. असा परखड इशारा सिईओ दिलीप स्वामी यांनी समन्वय सभा व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ च्या जिल्हा स्तरीय कार्यशाळेत दिला.
यशवंतराव चव्हाण सभागृह येथे गटविकास अधिकारी, जिल्हा व तालुकास्तरीय विभागप्रमुख यांची समन्वय बैठक घेणेत आली. या प्रसंगी ते बोलत होते.या प्रसंगी स्वच्छता ही सेवा या अभियान अंतर्गत स्वच्छतेची शपथ सिईओ स्वामी यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन ) चंचल पाटील, उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत ) ईशाधीन शेळके, उपमुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) स्मिता पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक कोळी , कार्यकारी अभियंता कदम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्हयात ४० हजार ३७५ शौषखड्डे चे उदिष्ठ देणेत आले आहे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात समाविष्ट असलेल्या विशेषत ५ हजार लोकसंख्येचे वरील ४२५ ग्रामपंचायती मध्ये किमान १०० शौषखड्डे, इतर ग्रामपंचायती मध्ये ५० व माझी वसुंधरा मधील १७ ग्रामपंचायती मध्ये २५० शौषखड्डे घेणेचे सुचना दिले आहेत. रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावात शौषखड्डे घेणेबाबत शासन निर्णय झाला आहे. रोहयो आयुक्त यांनी गटविकास अधिकारी यांची बैठक घेऊन सुचना दिलेल्सा आहेत. जे कोणी ग्रामसेवक काम करणार नाहीत त्याचेवर प्रशासकीय कारवाई करा. सनियंत्रण करनारे क्षेत्रीय अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करा. काम न झालेस गटविकास अधिकारी यांना जबाबदार धरणेत येईल असा स्पष्ट इशारा दिला.
स्थायित्व व सुजलाम अभियान अंत्रर्गत शौषखड्डे, माझी वसुंधरा अभियान, महा आवास, सेवा हक्क अभियान, शाळा सौदर्यीकरण, माझे गाव कोरोनामुक्त गाव अभियान, पोषण अभियान, उमेद , जलजीवन मिशन नळजोडणी अभियान व पाणी पुरवठा योजना याबाबत टाॅप टेन विषयावर त्यांनी विभागनिहाय आढावा घेऊन सुचना दिल्या. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ या अभियानात १ हजार गुणांची माहिती द्यावी लागणार आहे. त्या दृष्ट्रीने तयारी करा. स्वच्छता ही सेवा व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोबाईल अॅपवर प्रतिसाद घेणेचे सुचना दिल्या.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी वैयक्तीक शौचालय लाभार्थ्यांची यादी वेळेत पाठविणेच्या सुचना दिल्या. उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी माझी वसुंधरा अभियानात गाव पातळीवरील आराखडे तयार करणेचे सुचना दिल्या. रोहयो मधून शौषखड्डे घेणारी लाभार्थ्यांची यादी पाच दिवसात निश्चित करणेचे सुचना दिल्या. उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी सेवा हक्क अभियानात गाव पातळींवर कॅम्प घेणेचे सुचना दिल्या.


















