सोलापूर (प्रतिनिधी) उजनी जलाशयातून सीना नदीवरील शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची तरतूद असून त्याखालील पाकणी पासून कोर्सेगाव पर्यंत ९ बंधारे भरण्यासाठी पाणीवाटप धोरणा तरतूद करा व सध्या पिण्याचे पाण्यासाठी सिना नदीत पाणी सोडण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे धीरज साळे यांना निवेदनाद्वारे केली.
दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिक, शेतकरी यांच्यावतीने लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता यांना भेटून सिना नदीत पाणी सोडण्यासंदर्भात चर्चा केली. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयातून सिना नदी काठच्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी उजनी प्रकल्पाच्या पाणी वाटप नियोजनात बदल करणे आवश्यक आहे. सध्या शिरापूर बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याची तरतूद आहे. त्याखालील पाकणी पासून कोर्सेगाव पर्यंत 9 बंधारे असून यावर पाणीपुरवठा योजना आहेत. त्यामुळे या भागात देखील पाणी सोडणे गरजेचे आहे. शासनाने समन्यायी वाटप धोरण स्विकारले असून यापुढे सिना नदीतून पाकणी बंधाऱ्यापासून कोर्सेगाव बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन करा अन्यथा महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणकडे कायदेशीर दाद मागू असे माने यांनी सांगितले.
पावसाचे चारही महिने संपले तरी जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही. खरीप पिके हातची गेली. तर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सध्या सिना नदी कोरडी असल्याने नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाण्याची, जनावरांसाठी व पिकांसाठी सीना नदीत सद्यस्थितीत पाणी सोडणे आवश्यक आहे. तरी या भागातील परिस्थितीचा विचार करून सिना नदीत कारंबा शाखा कालवा कि.मी. 39 मधून पाकणी को.प. पासून कोर्सेगाव बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी माने यांनी केली.
यावेळी कार्यकारी अभियंता संभाजी माने, दिगंबर तात्या मेठे, प्रकाश अवताडे, विकास पाटील, शिवाजी पाटील, गोवर्धन जगताप, बालाजी येलगुंडे, काशिनाथ गौडगुंडे, सोमनाथ गायकवाड, लता जावीर,ज्ञानोबा साखरे,गणपत बचुटे, अशोक गुंड, उमाकांत बचुटे, कुमार बचुटे, अजय सोनटक्के, सुदर्शन पाटील, निखिल देशपांडे, जैनुद्दीन शेख, तानाजी सिनगारे, प्रभाकर गुंड, पृथ्वीराज माने, युवा मंच अध्यक्ष सुनील जाधव, उमेश भगत, तात्या कदम, किरण बंडगर,महेंद्र खटके, अजय रेवजे, ज्ञानेश्वर साळुंखे, दत्ता पवार, तुकाराम भडकुंबे, पठाण सलगर, मुरलीधर शिंदे आदीसह दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ते, नागरिक, शेतकरी उपस्थित होते.