सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षणप्रसारक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील या थोर समाज सुधारकांच्या बाबत अवमानास्पद वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांच्या विरोधात बुधवारी आंबेडकर चौक येथेव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महामंडळ, सोलापूरच्या व सोलापूर शहर-जिल्ह्यातील भिम सैनिकांच्या वतीने विराट मोर्चा संपन्न झाला. या मोर्चा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला.
आपल्या भाषणात बरडे म्हणाले, 16 डिसेंबर रोजी सोलापुरात शिवजन्मोत्सव मध्यवर्ती च्या वतीने सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती तो बंद सोलापूरकरांनी शंभर टक्के यशस्वी केला हे यश शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्रित आल्यानेच मिळाले. असे सांगताना ते पुढे म्हणाले, आज पर्यंत शिवशक्ती भीमशक्ती मध्ये भांडणे लावली गेली आणि सत्तेची पोळी खाणाऱ्याने खाल्ली. छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर हे दोन महापुरुष देश मान्य आहेत. यापुढं जर या महापुरुषांबद्दल कुणी ब्र वक्तव्य काढले तर शिवशक्ती व भीमशक्ती गप्प बसणार नाही. भारतीय जनता पक्ष राज्यातील शिवशक्ती-भिमशक्तीचा उद्रेक पाहत आहे. भविष्यातील महापालिकेच्या निवडणुकीत ही एकी दाखवून भाजपला बाहेर फेका असे आवाहन बरडे यांनी केले..




















