महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते हे महाराष्ट्रसह संपूर्ण देशात पक्षाच्या संघटन वाढीसाठी सातत्य प्रयत्न करत असतात. पक्षाने कुठलीही जबाबदारी दिली ती नित्यनेमाने पार पडून तिथे पक्ष व संघटना मजबूत करणे हेच त्यांचे उद्देश आहे. पक्षाने त्यांना नुकतेच झालेल्या कर्नाटका विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावर जबाबदारी दिली होती. दीड ते दोन महिने परिश्रम घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न केल्याबद्दल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के सी वेणूगोपाल यांनी सुदीप चाकोते यांच्यावर विश्वास टाकत पुढच्या महिन्यात होणाऱ्या तेलंगणा राज्याचे विधानसभा निवडणुकीसाठी AICC निरीक्षक म्हणून त्यांची नेमणूक केली आहे.
पेद्देपल्ली या जिल्ह्याचा जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आलेले आहे. सुदीप चाकोते पुढे म्हणाले निवड झाल्याचं मला खूप आनंद आहे पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे. निश्चितच काँग्रेस पक्ष विजय होऊन तेलंगाना राज्यात काँग्रेसची सत्ता स्थापन होईल असा विश्वास आहे व त्याच दिवशी माझं निवड हे सार्थक ठरेल असं विश्वास व्यक्त केला व मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के सी वेणुगोपाल यांचे निवड केल्याबद्दल मनापासून आभार मानले.