सोलापूर : भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभाग आणि नाफेडने ६० रुपये किलो दराने नागरिकांसाठी दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर भारत डाळच्या नावाने चना डाळ विक्री केली जाणार आहे. याची सुरुवात माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष किरण देशमुख, माजी सभागृह नेता शिवानंद पाटील, संजय कोळी, रोहिणी तळवलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे, अमर पुदाले, वंदना गायकवाड, ज्ञानेश्वर कारभारी, भैय्या बनसोडे, प्रथमेश आनंदकर, सुजित चौगुले आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्र शासनाने दिवाळी राशन दुकानातून उपलब्ध करून दिला त्याच पद्धतीने भारत सरकारच्या ग्राहक विभागाकडून 60 रुपये हरभरा डाळ उपलब्ध करून दिली जाणार आहे सर्वसामान्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.
लाभार्थ्यांनी डाळ घेताना आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. एक व्यक्तीला एका आधार कार्ड वर पाच किलो चना डाळ घेता येईल. येताना पिशवी सोबत आणणे असे आवाहन करण्यात आले.