आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये सध्या चांगलाच वाद पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीच्या विरोधात आता ओबीसी नेते एकत्र झाले असून त्यांनीही एल्गार सभा घेतली. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या टीका टिपणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम आणि प्रतिक्रिया घेतले असता, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात संकल्पबद्ध आहोत,पण राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पहा ते नक्की काय बोलले हा व्हिडिओ..