सोलापूर : यंदाच्या पावसाळ्यामध्ये संपूर्ण ऑगस्ट महिना पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंताग्रस्त झालास मात्र खरीप पिक संपूर्ण हातातून गेले आहे. आता परतीच्या पावसाची अपेक्षा आणि त्यांनी केली आहे.
संपूर्ण जुलै महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली मात्र ऑगस्ट महिना पाऊस पडला नाही. उडीद, मूग, सोयाबीन, तूर या सर्व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
संपूर्ण एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मंगळवेढा तालुक्यातील बोराळे भागात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. इतका पाऊस झाला की शेतातून कंबरे एवढे पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून येते. पावसाचे हे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.