

सोलापूरच्या पाणी प्रश्न नागरिकांना दिलासा देणारा निर्णय ; राष्ट्रवादीचे ‘अण्णा द ग्रेट’ ; नाय तर संक्रात तुमच्याकडं येईल

सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सह संपर्क मंत्री होता विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सोलापूरचा तीन दिवसाचा दौरा केला होता यादव यांना दरम्यान त्यांनी सोलापुरातील अनेक प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या त्या समस्यांवर नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान त्यांनी सोलापूर शहरातील अधिकारी राजकीय नेते पत्रकार यांची बैठक आयोजित केली.
या बैठकीत सोलापूरच्या समस्यांवर अतिशय तळमळीने आणि जातीने त्यांनी लक्ष घातल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत सोलापूरकरांना आणि विशेष करून महिला वर्गाला अतिशय दिलासा देणारा निर्णय म्हणजे रात्रीचा पाणीपुरवठा बंद करण्याच्या सक्त सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.
या बैठकीत सोलापूरच्या विस्कळीत पाणीपुरवठ्यावर तब्बल दीड तास चर्चा झाली यामध्ये प्रवीण डोंगरे, आनंद चंदनशिवे, किसन जाधव, तोफिक शेख यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली पत्रकारांनी सुद्धा अधिकाऱ्यांना या विषयात धारेवर धरले.
सर्वांच्या तक्रारी आणि सूचना ऐकून घेतल्यानंतर अण्णा बनसोडे यांनी महापालिका आयुक्तांना सूचना करताना शहराचा पाणीपुरवठा लगेच दोन दिवसा आड करता येतो का आणि रात्रीचा पाणीपुरवठा बंद करून तो दिवसा करता येतो का असे विचारले.
आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर निधी देण्यासाठी तीन ते चार महिने जातील,
आम्ही जर शासनाच्या वतीने तुमच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर तुम्ही किती दिवसात पूर्ण करणार? हा विभाग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केले तर तुमचे काय म्हणणे आहे, असे अनेक प्रश्न महापालिका आयुक्तान समोर उपस्थित केले.
मात्र आयुक्त ओंबासे यांनी आमच्या सारखीच त्यांची अवस्था आहे, आपल्याकडे आहे त्या यंत्रणेने काम करू, आपण दिलेल्या सूचनेनुसार गतीने काम करू असे सांगितले.
पाणीपुरवठा अधिकारी चौबे 28 वर्ष सेवा केली, त्याला काढून दुसरीकडे चार्ज दिला तर तो नाराज होणार, त्यानं सोलापूरच्या अर्ध्या लोकांना खुश केले असेल अशी चिमटे काढताना बनसोडे यांनी रात्रीच्या अकराच्या आत पाणी पुरवठा करा,तसे तातडीने नियोजन करा अशा सूचना महापालिका आयुक्तांना केल्या.




















