खा. प्रणिती शिंदे यांचा फडणवीसांवर या विषयी हल्लाबोल ; सोलापूर गोवा वरून प्रणिती शिंदे यांनी भाजपची उडवली खिल्ली
विधानसभा निवडणुकीत भाजपने षडयंत्र करून जिंकले म्हणून राहुल गांधी यांनी एक लेख लिहून भाजपला उघडे पाडले. निवडणुकीतील सत्य परिस्थिती लोकांसमोर निदर्शनाला आणले. निवडणूक आयोगाला जाब विचारले असता निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर न देता त्याचे उत्तर भाजपवाले आणि मुख्यमंत्री फडणवीस हे फसवे आकडेवारी देत उत्तर देत आहेत. मतदानाच्या वेळेनंतर मतदानाची आकडेवारी कशी वाढली याचे उत्तर देत नाही, CCTV फुटेज विचारले असता नरेंद्र मोदींनी कायदाच बदलून टाकला आणि CCTV फुटेज देता येत नाही म्हणून सांगितले. त्यामुळे फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये अशा भाषेत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तोफ डागली.
भाजप अतिशय खालच्या पातळीचे राजकारण करत आहे. म्हणून लोकशाहीचे चौथा स्तंभ असलेले पत्रकारांनी यांना उघडे पाडावे. तसेच आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपर वर झाले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.
सोलापूर शहरात गेल्या बारा वर्षापूर्वी विमानसेवा सुरू होती. भाजपच्या काळात बंद पडली. गेली अकरा वर्षे देशात राज्यात भाजपची सत्ता असून सुद्धा विमानसेवा का सुरू होऊ शकले नाही याचे उत्तर कोणीच देत नाही. काल सर्वांच्या प्रयत्नाने विमानसेवा सुरू झाली त्याचे स्वागत करते पण गोव्याला विमानसेवा सुरू करून कोणते उद्योग येणार आहेत. विमानसेवाच सुरू करायची असेल तर सोलापूर ते मुंबई, तिरुपती, बंगलोर, हैदराबाद, पुणे विमानसेवा सुरू करा त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्याचा विकास, प्रगती होईल. टेक्सटाइल, गारमेंट उद्योग, IT, इतर उद्योग सोलापूरात वाढीस लागतील, नवीन उद्योग येतील.
ऑपरेशन सिंदुर बाबत प्रचारसभेत मोठमोठ्ठे फिल्मी डायलॉग मरणारे मोदीजी ऑपरेशन सिंदुर ची माहिती देण्यासाठी जगभरात शिष्टमंडळे पाठवीत आहेत. व्यापाराची धमकी देऊन सीजफायर मी करायचे लावले म्हणून आतापर्यंत अमेरीकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आतापर्यंत बारा वेळा जाहीरपणे सांगितले त्यावर मोदी मूग गिळून गप्प आहेत. यामुळे सैन्यदलाचे मनोबल कमकुवत होत आहे. जनतेची आणि विरोधी पक्षाची मागणी आहे की संसदेत येऊन देशातल्या लोकांना याची माहिती द्यावी ते येत नाही आणि माहिती देत नाहीत. भारताचा विजय का घोषित केला नाही. त्यामुळे आम्ही ऑपरेशन सिंदुर संदर्भात विशेष अधिवेशनाची मागणी करत आहोत.
या पत्रकार परिषदेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, प्रदेश सरचिटणीस माजी महापौर संजय हेमगड्डी, मा. विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, परवीन इनामदार, अनुराधा काटकर, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश चिटणीस शकील मौलवी, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रवक्ते नागनाथ कदम, मध्य युवक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड, बाबुराव म्हेत्रे, VJNT अध्यक्ष युवराज जाधव, दिनेश म्हेत्रे, संजय गायकवाड, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, भीमराव शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.