सोलापूर – बुधवार 1 जून रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठच्या मुख्य प्रवेशद्वार येथे सोलापूर शहर जिल्हा विद्यार्थी संघर्ष समितीच्या वतीने बहुपर्यायी निवड प्रश्न परीक्षा पद्धती लागू करा ही प्रमुख मागणी घेऊन धरणे आंदोलन केले. यावेळी विद्यार्थी स्वतः हलगीनाद,शंख नाद व जोरदार घोषणाबाजी करून वातावरण तापवून सोडले.
यावेळी तब्बल दोन तास विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे पोलीस प्रशासन व विद्यापीठ प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला पाचारण केले व बाजू ऐकून घेतले.
नेमकी परीक्षा कोणत्या पध्दतीने घ्यावी व त्याचे पुढील मार्गदर्शक सूचना, वेळापत्रक याविषयी मंत्री महोदय व परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालक यांच्या सोबत यांच्याशी चर्चा झाली असून 16 जून रोजी न्यायालयाची सुनावणी आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी व परीक्षा वेळापत्रक बाबत फेरबदल व शुद्धीपत्र कळविले जाईल असे आश्वासन कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी दिल्या. तदनंतर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिष्टमंडळात अनिल वासम,केशव इंगळे,अविनाश इंगळे,संदिप क्षीरसागर, अभिषेक थोरात,शामसुंदर आडम, विद्यार्थी आघाडी एस.एफ.आय.चे मल्लेशम कारमपुरी, भरत जाधव, विजय गुंड, संतोष म्हमाणे, कृष्णा बाबरे, सम्यक गायकवाड, संतोष चव्हाण, चैतन्य केंगार , आनंद गोसकी आदी उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले की, सबब याबाबत महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठानी MCQ पद्धतीने परीक्षा घेण्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे या विषयीची अद्ययावत माहिती व शासन निर्णय आदींचा आढावा घेऊन सोलापूर विद्यापीठा मार्फत MCQ परीक्षा पद्धत लागू करावी. ही प्रमुख मागणी घेऊन विद्यार्थ्यांच्या मार्फत आपल्या कडे यापूर्वी निवेदने देण्यात आलेली आहेत. याचाही योग्य विचार विनिमय करून योग्य तो विद्यार्थी हिताचा सकारात्मक निर्णय घेऊन न्याय द्यावे.