ऐंशीच्या दशकात सोलापूर शहरात मोठ्या प्रमणात नागरीकरण आणि शहरीकरण होत असताना अत्यंत बिकट, दारिद्र्यात जगणाऱ्या कष्टकरी श्रमिकांना निवाऱ्यासाठी झगडावे लागत असे यावेळी शहरातील मोकळ्या जागेत नागरिकांनी झोपडपट्ट्या वसवले. वास्तविक प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे हे केंद्र सरकारचे धोरण अमलात आणण्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती प्रबळ नव्हती. यावेळी प्रत्येक झोपडपट्टीला कायद्याचे संरक्षण मिळावे आणि त्या झोपडपट्ट्याचे पुनर्वसन व्हावे याकरिता नरसय्या आडम मास्तर यांनी वेळोवेळी राज्य सरकारपुढे पाठपुरावा केले. व कित्येक झोपडपट्ट्या कायम करण्यास भाग पाडले.
यामध्ये १९८४ साली कुमठा नाका परिसरातील भारत नगर, तक्षशील नगर, पंचशील नगर झोपडपट्टी वसलेली होती. या झोपडपट्टीला कायद्याचे संरक्षण मिळवून देऊन झोपडपट्टीला मान्यता मिळवून दिली. त्यानंतर अनेकवेळा भूमी व मालमत्ता अधीक्षक कार्यालयाकडून झोपडपट्टी विस्थापित करण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यावेळी आडम मास्तर स्वतः सरकारकडून स्थगिती आणून सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरीचे आदेश काढण्यास भाग पाडले. भूमी अधीक्षक अधिकारी यांनी २६/०५/२०२२ रोजी अनधिकृत झोपड्या काढण्याचे आदेश देण्यात आले. याच्या विरोधात या भागातील सर्व नागरिकांनी ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार ६ जून २०२२ रोजी सोलापूर महानगर पालिका आयुक्तांना शिष्टमंडळाद्वारे झोपडपट्ट्याना कायद्याचे संरक्षण व पुनर्वसनाबाबत निवेदन दिले. यावेळी आयुक्तांसमोर कॉ. आडम मास्तर म्हणाले कि, या झोपडपट्टीवासियांना विस्थापित होऊ देणार नाही. कदाचित यासाठी लाठ्याकाठ्या अंगावर झेलेन, तुरुंगातही जाईन पण झोपडपट्ट्याना संरक्षण मिळवून देण्याचा वज्र निर्धार केला.
सोमवार ६ जून २०२२ रोजी भारत नगर, तक्षशील नगर, पंचशील नगर भागातील नागरिकांनी नगरसेविका कॉ.कामिनिताई आडम, माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. विल्यम ससाणे, नागेश माने यांच्या नेतृत्वाखाली ३०० च्यावर नागरिकांसमवेत सोलापूर महानगर पालिका आयुक्त कार्यालय येथे दाखल झाले व आपल्या निवाऱ्यासाठी ठिय्या मांडला.
तद्नंतर नगरसेविका कॉ.कामिनिताई आडम, माजी नगरसेविका कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. विल्यम ससाणे, मुन्ना कलबुर्गी, नागेश माने, अमोल काशीद, राजेश काशीद, देविदास जंगम, प्रकाश शेंडगे, भारत पाथरूट, बापू साबळे आदींच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.