सोलापूर : भीमशक्ती सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा कदम, प्रदेश उपाध्यक्ष नागेश बंगाळे, शहर अध्यक्ष उमेश सुरते, जिल्हा अध्यक्ष संजय रणदिवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तूपलोंढे, महिला शहर अध्यक्ष ऍड सुनयना थोरात, सतीश ढावरे, के एम कांबळे, विशाल बसवा यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
राष्ट्रपिता म.ज्योतीराव फुले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या राष्ट्र पुरुषांना जाणीवपुर्वक हेतूपुरस्सर दलित, बौध्द, मागासवर्गीय बहुजन समाजात अशांतता निर्माण व्हावी या उद्देशाने चंद्रकांत पाटील यांनी भिक मागून शाळा सुरु केली आहे. असे अवसानकारक विधान संबोधले आहे. हे भारतीय दंड संहिता प्रकरण २२ प्रमाणे फौजदारी पात्र, धाकटपणा करणे या प्रकारचे हे कृत्य आहे. चंद्रकांत पाटील हे ज्या पदावर आहेत त्या पदावर कुठली भाषा बोलावी अथवा बोलू नये, कुठल्या गोष्टी प्रक्षोभक, अपमानास्पद असतात हे माहित असताना देखील त्यांनी जाणीवपूर्वक या महापुरुषांचा अवमान केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यात ठिकठिकाणी निदर्शने आदोलने, प्रदर्शने होत आहेत, यामुळे शांतता व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय महापुरुषांच्या संदर्भात घटनेच्या अवमान प्रतिबंधात्मक कायदा १९७१ प्रमाणे अनु. जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधात्मक कायदानुसार त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा.
पिंपरी चिंचवड येथे शाई फेकणा-या भिम सैनिक मनोज गरवडे, धनंजय विजय ओहाळ यांच्यावर ३०७,३५३ व इतर खोटे गुन्हे मागे घ्यावेत व ज्यांनी खोटी फिर्याद दिली आहे. त्यांच्यावरतीही गुन्हे दाखल करण्यात यावेत. ज्या पोलिस कर्मचा-यांचे निलंबन केले आहे, त्यांचे निलंबनही त्वरीत मागे घेण्यात यावे. व एका दैनिकाच्या पत्रकारावर गुन्हा करण्यात आला आहे. तोदेखील मागे घेण्यात यावा अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत.


















