सोलापूर : माजी आमदार दिलीप माने यांनी उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले, सोलापूर जिल्ह्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिण्यात अपवाद वगळता कूठेही पाऊस झालेला नाही, त्यामुळे पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने आवश्यक उपाय योजना करावी. तसेच पावसाअभावी बाधित खरिप पिकाचे पंचनामे (जाचक अटी शिथिल करुन) करावेत व पिकविमा रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच मागील वर्षी सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नूकसान भरपाई रक्कम अद्यापी काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. ही रक्कम देखील त्वरीत शेतकऱ्यांना मिळण्याची मागणी केली.
यावेळी माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, गंगाधर बिराजदार, राजशेखर पाटील, चंद्रकांत कुलकर्णी, बापूराव पाटील, विकास घाटोळे, सुनील जाधव, पृथ्वीराज राठोड, अजय रेवजे, निखिल देशपांडे, अजय सोनटक्के, किसन भिंगारे, राम सुरवसे, सोमनाथ बचुटे, बापूसाहेब शिंदे, सोमनाथ गायकवाड, किरण बंडगर, नितीन गव्हाणे, मारुती गोरे, अनिल जाधव, अंबादास पाटील, महेंद्र खटके, भगवान कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.