राज्य सरकारने 15 ऑगस्ट पासून राज्यातील सर्व व्यापार व दुकाने, हॉटेल हे रात्री 10 पर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला परंतू कोरोनाचे निर्बंध घालून ही सूट देण्यात आली आहे, तसा आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला, दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरांमध्ये कोरोणाची रुग्ण संख्या कमी आहे त्यामुळे शहरात व्यापार सुरू होणार का अशी उत्सुकता आणि चर्चा होती त्याच पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांचे सही न केलेला आणि जावक क्रमांक न टाकलेला सुधारित आदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यानुसार रविवार 15 ऑगस्ट पासून राज्य सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे सोलापुरात निर्बंध हटवण्यात आल्याचं दिसून येत आहे. या आदेशात त्यांनी ….
ज्याअर्थी राज्य शासनाने कोरोना विषाणूचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखणेसाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ च्या खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार दिनांक १४ मार्च २०२० रोजी अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर अधिसूचनेनुसार साथ रोग अधिनियमाच्या खंड २ (१) नुसार महानगरपालिका आयुक्त यांना नियमांची अंमलबजावणी करणेकामी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केलेले आहे.
मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांच्या संदर्भ क्र.३० यास अनुसरुन कोविड़ १९ चे विषाणू चा प्रादुर्भाव रोखणेकामी करावयाच्या उपाययोजनेच्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात ब्रेक द चेन सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करणेचे निर्देश प्राप्त झालेले आहे.
त्याअर्थी, मी, पि. शिवशंकर, भा.प्र.से., आयुक्त, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार व देण्यात आलेल्या सूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या दृष्टिने कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी प्राप्त निर्देशानुसार सुधारीत आदेश दि. १५/०८/२०२१ रोजी पासून पुढील आदेशापर्यंत लागू करीत करण्यात येत आहेत.
१) उपहारगृहे :
खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने खालील अटीच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.
अ उपहारगृह / बारमध्ये प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील.
ब) उपहारगृह / बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचान्यांसह सर्व कर्मचाऱ्याचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहिल व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करु शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल.
क) वातानुकुलित उपहारगृह / बार असल्यास वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहिल. प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक राहील.
इ) उपहारगृह / बारमध्ये विहित शारीरिक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्यवस्था करण्यात यावी. फ) उपहारगृह / बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे आवश्यक राहील. उपरोक्तनुसार उपहारगृहे/बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस सकाळी ७.०० पासून रात्री १०.०० वा. पर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह / बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री ९.०० वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेविरुध्द अथवा व्यक्तिविरुध्द कार्यवाही करणेकामी संबंधित कार्यक्षेत्रातील विभागीय अधिकारी, संबंधित परवाना विभागातील कर्मचारी, मुख्य आरोग्य निरिक्षक तसेच संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक व त्यावरील दर्जाचे पोलीस अधिकारी यांना राहतील.
उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापना / चालक मालक यांच्यावर प्रथम उल्लंघन करीता र.रु. १००००/- दंडाची कार्यवाही करण्यात यावी व नोटीस देण्यात येईल व द्वितीय उल्लंघन झाल्यास सदरची आस्थापना ७ दिवसांसाठी सिल करण्यात येईल.
२) दुकाने:
राज्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस सकाळी ७.०० पासून रात्री १०.०० वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पुर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.
विवाह सोहळे :
अ खुल्या प्रांगणातील / लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन/ मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. खुल्या प्रांगण / लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या ५० टक्के परंतू जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असेल.
क) बंदिस्त मंगल कार्यालय / हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या ५० टक्के परंतु जास्तीत जास्त १०० व्यक्ती या मर्यादित असेल.
ड) मात्र कोणत्याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी व्हिडीओ रेकॉडींग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकान्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहील. या निबंधाचे उल्लंघन करणाऱ्यावर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.
इ) तसेच मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्यवस्थापन / भोजन व्यवस्थापन / बँडपथक / भटजी / फोटोग्राफर्स अशा विवाह व्यवस्थेशी संबंधित सर्व सलग्न संस्था यामधील व्यवस्थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.
उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनेविरुध्द कार्यवाही करणेकामी संबंधित कार्यक्षेत्रातील विभागीय अधिकारी, मुख्य आरोग्य निरिक्षक, आरोग्य निरिक्षक तसेच संबंधित विभागाच्या पोलीस स्टेशनचे पोलिस नाईक व त्यावरील अधिकारी यांना राहतील.
उपरोक्त प्रमाणे देण्यात आलेल्या नियमांचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापना / चालक मालक यांच्यावर प्रथम उल्लंघन करीता र.रु. १००००/- दंडाची कार्यवाही करण्यात यावी व नोटीस देण्यात येईल व द्वितीय उल्लंघन झाल्यास सदरची आस्थापना ७ दिवस सिल करण्यात येईल,
![]() |
























