राज्य सरकारने १७ ऑगस्ट, २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी चे वर्ग व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोविड परिस्थिती विचारात घेवून शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित महानगरपालिका आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. तसेच दिनांक २ ऑगस्ट, २०२१ रोजीच्या ब्रेक द चेन मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनानूसार कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, •पालघर जिल्ह्यातील कोविड परिस्थिती विचारात घेवून व अन्य जिल्ह्यांबाबत देखील शाळा सुरू करणेबाबत निर्णय घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे.
महानगरपालीका क्षेत्रातील शाळा सुरू करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करावी.
१. आयुक्त, महानगरपालीका अध्यक्ष
२. वार्ड ऑफीसर सदस्य
३. वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका सदस्य
४. शिक्षणाधिकारी / शिक्षण निरीक्षक सदस्य
नगरपंचायत/नगरपालिका / ग्रामपंचायत स्तरावर यांच्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करावी.
१. जिल्हाधिकारी अध्यक्ष
२. मुख्याधिकारी, नगरपरिषद सदस्य
३. वैद्यकीय अधिकारी, नगरपरिषद / जिल्हा आरोग्य अधिकारी सदस्य
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) सदस्य
(७.१) समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी. (i) शाळा सुरु करण्यापूर्वी कमीत कमी १ महिना संबंधित शहरात / गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा.
(ii) शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद / आयुक्त, महानगरपालिका/मुख्याधिकारी, नगरपरिषद व शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा.
(ii) विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.






















