सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील झालेल्या 12 ग्रामपंचायत निवडणुकीत दिलीप माने गटाने तालुक्यावर वर्चस्व राखले. माने गटाने लढवलेल्या 10 ग्रामपंचायत पैकी 8 सरपंच पदावर विजय मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे. एक ठिकाणी राष्ट्रवादी तर 3 ठिकाणी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत.
माने गटाने जिंकलेल्या सरपंच पदासह ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे..
पाकणी-बालाजी येलगुंडे (सरपंच) 8 सदस्य
कवठे- मारुती इंजीनवाले (सरपंच) 6 सदस्य
अकोलेकाटी-अंजली क्षीरसागर (सरपंच) 7 सदस्य
कारंबा-तुकाराम चव्हाण (सरपंच) 9 सदस्य
नरोटेवाडी-उमेश भगत (सरपंच) 6 सदस्य
नंदूर-गंगुबाई व्हनमाने (सरपंच) 9 सदस्य
शिवणी-प्रियांका खळसोडे (सरपंच) 7 सदस्य
रानमसले-मनोहर क्षीरसागर (सरपंच) 4 सदस्य
माने गटाने मार्डी व कौठाळी या ग्रामपंचायत लढवल्या नाहीत त्याठिकाणी मार्डीमध्ये भाजप-राष्ट्रवादी पुरस्कृत प्रांजली पवार या विजयी झाल्या आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे यांचा पराभव केला. गावडी दारफळ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काका साठे यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला तिथे भारत माळी हे सरपंच पदी विजयी झाले. कौठाळीत भाजपच्या श्वेता पाटील या सरपंच पदी विजयी झाल्या, डोणगाव मध्ये मात्र माने गटाचे सरपंच 17 मतांनी पराभूत झाले त्याठिकाणी राजश्री आमले विजयी झाल्या.
निवडणूकीचे निकाल हाती येताच विजयी उमेदवार समर्थकांनी सोलापूर शहरातील ब्रम्हदेवदादा माने बँकेसमोर हलगीच्या निनादात गुलालाची मुक्त उधळण करत एकच जल्लोष केला, सर्वांचा दिलीप माने व पृथ्वीराज माने यांनी सत्कार केला.
पत्रकारांशी बोलताना माने म्हणाले, आम्ही उत्तर व दक्षिण तालुक्यात भाजपला रोखण्यात यशस्वी झालो असून उत्तर तालुक्यात 10 पैकी 8 जागा माने गटाने राखल्याचा दावा त्यांनी केला..




















