सोलापूर दि. २८ अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक भारतीयाला तारेवरची कसरत करावी लागते. सरकार कोणाचेही असो श्रमिकांना उदरनिर्वाहाची साधने उपलब्ध नाहीत, बेरोजगारीने कळस गाठला आहे ही आव्हाने समोर आहेत. ही आव्हाने सर करताना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्व सुविधा युक्त हक्काचे घर ही मिळाले. पाहिजे याच साठी लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली श्रमिकांचा महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पातून जगाच्या पाठीवर अभिनव असे नवे शहर साकारत असून याला लढावू जनतेची खंबीर साथ असल्याची कृतार्थ भावना संस्थेचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
हुतात्मा रेडीमेड व शिलाई कामगार सहकरी गृहनिर्माण संस्था तसेच को मधुकर के पंधे यंत्रमाग सहकारी गृहनिर्माण संस्था या दोन्ही संस्थेच्या च्या वतीने बुधवार दि. २८ सप्टेंबर २०२२ रोजी हुतात्मा स्मृती मंदीर येथे संस्थेचे चेअरमन लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची ११ वे वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
ते पुढे बोलतांना म्हणाले कि, पंतप्रधान मोदी साहेब देशाचे नवरत्न म्हणून ज्याचे उल्लेख करतात ते सर्व म्हणजे रेल्वे, विमान, जहाज, बँका, विमा कंपनी, रस्ते, खाणी या सारखे सार्वजनिक उद्योगधंदे भांडवलदारांच्या घशामध्ये घालत आहे. संपूर्ण देशात गुलामगिरी आणि हुकुमशाहीचा कारभार चालू आहे. देशात अभूतपूर्व अशी महागाई, बेकारी वाढलेली असून प्रचंड प्रमाणात उपासमारी, आत्महत्या चालू आहेत. भारताच्या स्वातंत्र्य नंतर पहिल्यांदाच पेट्रोलियम पदार्थ, घरगुती गॅस किमती ७० टक्के, भाजीपाल्याच्या २० टक्के, स्वयंपाकाच्या तेलाच्या किंमती २३ टक्के, डाळीचे भाव ८ टक्के वाढल्या आहेत. भारतीयांच्या दैनंदिन आहारात आवश्यक असलेला गहू १४ टक्क्यांनी महाग झाला आहे. मोदी सरकारच्या कारभाराचा अजब नमुना म्हणजे आजमितीस ज्या खाद्यपदार्थावर जीएसटी नव्हती त्याच्यावर ५ टक्के जीएसटी लावून जनतेचा विश्वासघात केला. लहान मुलांच्या दुधापासून ते मेलेल्या माणसाच्या सरपणापर्यंत जीएसटी लावले. कामगारांनी लढून मिळविलेली कायदे रसतळ्यात पोहचविण्याचे काम करीत आहेत. म्हणून येणाऱ्या महानगर पालिका व विधान सभेच्या निवडणुकीत भांडवलदारी पक्षाला मतदान न करता कष्टकरी कामगारांच्या बाजूने भक्कम उभे राहणाऱ्या लाल बावट्याच्या उमेदवारांना मतदान करा असे आवाहन केले.
वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात शहीद भगतसिंग, सोलापूरचे चार हुतात्मे तसेच मधुकर के. पंधे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी व्यासपीठावर कॉ. संदीप रेऊरे, मनीषा लोखंडे, सविता जाधव, वृंदा गांबीर, मोहन दुडम, शंकर गड्डम, नरसप्पा चिम्मन, शहाबुद्दीन शेख, धनराज हुंडेकरी आदींची उपस्थिती होती.
सिटूचे राज्य महासचिव कॉ. एम.एच. शेख, किशोर महेता, व्यंकटेश कोंगारी यांनी सभेला मार्गदर्शन केले. कॉ. युसूफ (मेजर) शेख यांनी प्रास्ताविक केले. तर संस्थेचे लेखापाल कॉ. गजेंद्र दंडी यांनी वर्षी जमा-खर्चाचा लेखापरीक्षणाचा अहवाल सादर केले व त्यास वार्षिक सर्वसाधारण सभेने एकमताने मंजूर केले. या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॉ. शाम आडम यांनी केले.
सदर वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वी करण्यासाठी वीरेंद्र पद्मा, बाळकृष्ण मल्याळ, दीपक निकंबे,पांडूरंग म्हैत्रे,अभिजीत निकबे, नागेश म्हेत्रे, बालराज म्हैत्रे, प्रकाश कुल्हाडकर, शिवा श्रीराम, प्रशांत विटे, प्रवीण आडम, सेनापती मरेड्डी, अंबाजी दौतुल, संजीव ओमकार, मल्लिकार्जुन बेलियार, बालाजी गुंडे, किशोर गुंडला, निकिता गोने, रईसा शेख, प्रकाश शेंडगे, विद्या चंद्री, प्रिया कोललापुरे, रजनी दंडी आदींनी परिश्रम घेतले.




















