भारताची चंद्रावर स्वारी करण्याची मोहिम अखेर फत्ते झाली. चांद्रयान ३ नं इतिहास रचला असून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे.
आतापर्यंत तीन देशांनी आपली चांद्रमोहिम यशस्वी केली आहे. त्यामध्ये रशिया, अमेरिका आणि चीन या देशांचा समावेश आहे. पण यापैकी कोणत्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान उतरवले नव्हते. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणारा पहिला देश ठरला आहे.
संपूर्ण भारतवाशियांसाठी अभिमानास्पद ठरलेल्या चंद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग झाले नंतर माजी आमदार दिलीप माने यांचे समर्थक, परिवार सदस्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
ब्रह्मदेवदादा माने बँकेच्या प्रांगणात दूरदर्शनवर सायंकाळी ६.०४ वा. चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर फटाके उडवून, तिरंगा फडकवत, पेढे वाटून भारत मातेच्या घोषणा देत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. डोळ्याचे पारणे फेडणारा, नसानसात ऊर्जा वाढवणारा हा क्षण ठरला. भारत देशाने जगात इतिहास घडवला इस्रोचे शास्त्रज्ञांनी 140 कोटी जनतेच्या भारत देशाची मान जगात उंचावली असे माजी आमदार दिलीप माने यांनी अभिमानाने सांगितले.
यावेळी ब्रह्मदेवदादा माने बँकेचे संचालक नाना पवार, पप्पू साखरे, शावरप्पा वाघमारे, सोमनाथ गायकवाड, पृथ्वीराज माने युवा मंचचे अध्यक्ष सुनील जाधव, समन्वयक उमेश भगत, अजय सोनटक्के, सचिव तात्या कदम, वळसंगकर रुग्णालय संचालक गोवर्धन जगताप, पंचायत समिती उत्तर सोलापूर माजी उपसभापती संभाजी भडकुंबे सोलापूर, खरेदी विक्री संघ संचालक मुकुंद गरड, जैनुद्दीन शेख, महेंद्र खटके, अजय रेवजे, राहुल जाधव, सुनील भोसले, प्रदीप सुरावसे, शिवा व्हसाळे, अनिल हिबारे, शहाजी भोसले, सागर तांबे इ. उपस्थित होते