पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगांव येथील मोहन संभाजी यलमार यांनी आपल्या कुटुंबासोबत स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करून लक्ष वेधले. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, नॅशनल हायवे क्र.९६५ मध्ये गट नं. १२२ मधील जमीन माझी शासनाने संपादित केली आहे. माझे नांवे गट नं.१२२ भंडीशेगांव ही माझ्या नावाने स्वतंत्र ७/१२ उतारा आहे.
माझी व आपल्या कार्यालयाची फसवणूक करून खोटे शपथपत्र सादर करून व माझे कोणतीही सहमती नसताना प्रकाश गणपत यलमार, प्रशांत मोहन गांधी, सुधीर दत्तात्रय हुनुगुरे व इतर सहकारी यांनी अधिकारी यांच्या संगनमताने आर्थिक फायदयाकरीता बेकायदेशीरपणे रक्कम वर्ग करून घेतली आहे. तरी मी पंढरपूर येथील कार्यालयाकडे दाद मागितली असता माझी कुठलची दखल घेतली नाही. पोलीसात देखील तक्रार केली असता तेथे देखील घेतली नाही.
भूसंपादन झाल्यापासून आजतागयत आम्ही आपल्या कार्यालयाकडे हेलपाटे मारत आहे. तरी आपल्या कार्यालयाने दखल घेतली नाही. तरी तात्काळ त्या अधिकाऱ्यावरती व वरील लोकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावे व माझे शेतजमीनीचे पैसे मला मिळावे अशी मागणी केली आहे.