सोलापूर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाअंतर्गत चालणाऱ्या कारभारावर संताप व्यक्त केला. माळशिरस तालुक्यातील काही गावे आणि वाड्या वस्त्यांवर जल जीवन मशीनचे काम अतिशय बोगस सुरू असल्याचा आरोप केला. या योजनेचे काम म्हणजे केवळ कॉन्ट्रॅक्टर यांचे घर भरण्याचा प्रकार असल्याचे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी लक्ष घालावे अन्यथा “माय माऊल्या आम्हाला माफ करणार नाहीत”अशा शब्दात संताप व्यक्त केला. आमदार बबनराव शिंदे आमदार यशवंत माने यांनीही राम सातपुते यांची बाजू घेतली.. काय घडले सभागृहात पहा व्हिडिओ…